चंद्रपूर -उपग्रह अवकाशात पाठवताना त्याचे योग्य नियोजन आणि पुरेपूर तयारी करावी लागते. मात्र काल रात्री जी दुर्घटना झाली. त्यात तांत्रिक किंवा मानवी चूक कारणीभूत आहे. त्यामुळे उपग्रह सोडताना त्याच्या वेगळ्या झालेल्या वस्तू अंतराळातून पसरता त्या पृथ्वीवर आल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण घटनेचा योग्य तो तपास होईलच, मात्र इतकी मोठी घटना घडल्यावर याला जबाबदार यंत्रणा स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेण्याची शक्यता ही फारच कमी असल्याचे मत स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक मंडळींनी व्यक्त केली आहे.
Skywatch Group Chandrapur : जबाबदार यंत्रणा स्वतःहून समोर येण्याची शक्यता कमीच; उपग्रहाच्या दुर्घटनेबाबत तज्ज्ञांच मत - स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक चंद्रपूर
उपग्रह सोडताना त्याच्या वेगळ्या झालेल्या वस्तू अंतराळातून पसरता त्या पृथ्वीवर आल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण घटनेचा योग्य तो तपास होईलच, मात्र इतकी मोठी घटना घडल्यावर याला जबाबदार यंत्रणा स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेण्याची शक्यता ही फारच कमी असल्याचे मत स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक मंडळींनी व्यक्त केली आहे.
![Skywatch Group Chandrapur : जबाबदार यंत्रणा स्वतःहून समोर येण्याची शक्यता कमीच; उपग्रहाच्या दुर्घटनेबाबत तज्ज्ञांच मत चंद्रपुरात आढळलेले उपग्रहाचे अवशेष](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14919150-thumbnail-3x2-n.jpg)
'...म्हणून ते अवशेष कोसळले असावे' :जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आज ( रविवारी ) खगोलशास्त्रीय अभ्यासकांचा स्कायवॉचचा ग्रुप घटनास्थळी गेला होता. या ग्रुपचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे, प्रा. सचिन वझलवार, प्रा. योगेश दुधपचारे यांनी घटनास्थळी जाऊन तबकडी आणि एक धातूचा गोळा या दोन्ही वस्तूंचे तांत्रिक निरीक्षण केले. त्याच्या नोंदी त्यांनी घेतल्या असून या संदर्भातील माहिती ते इत्स्रो आणि इतर संशोधन संस्थांकडे पाठविणार आहेत. त्यांच्या अभ्यासात हे उपग्रह सोडताना त्याचे अवशेष असल्याचे समोर आले. त्यांच्या अंदाजानुसार एका अमेरिकन कंपनीचे दोन रॉकेत न्यूझीलंड येथून सोडण्यात आले. पृथ्वीच्या कक्षेत येऊन पृथ्वीचे निरक्षण करण्याचे काम हे उपग्रह करणार होते. मात्र, रॉकेट उडविण्यामागे जगातील इतर देशांचे तंत्रज्ञान हे खूप समोर आहे. मात्र यात कदाचित चूक झाली असावी ज्यामुळे हे अवशेष समुद्रात किंवा वाळवंटात पडण्याऐवजी मानवी वस्तीत पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी ही अत्यंत गंभीर चूक असून याची स्वतःहून जबाबदारी घेण्यास कुठली यंत्रणा समोर येणार नसल्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.