चंद्रपूर - रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. अशातच आज रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. युद्धाची शक्यता असतानाही केंद्र सरकार युद्ध सुरू होईपर्यंत स्वस्थ कशी होती. मोदी सरकारने वेळीच पाऊले उचलली असती तर ही वेळ आली नसती, असा आरोप करत एनएसयुआयच्या वतीने जटपुरा गेटसमोर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात ( NSUI Protest Against Central Government ) आली.
...तर ही वेळ आली नसती -युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक विद्यार्थी भारतात सुखरूप परतले असले तरी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी अडकले आहेत. अशातच एका विद्यार्थ्याचा रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण आहे. मोदी सरकारने जर वेळीच पाऊल उचलले असते तर ही वेळ आली नसती, असा आरोप काँग्रेसच्या एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव रोशनलाल बिट्टू यांनी केला आहे.