महाराष्ट्र

maharashtra

'ज्यांच्या घड्याळाचे बारा वाजले त्यांच्याबद्दल काय बोलयचे'

By

Published : Jan 28, 2020, 8:02 AM IST

महिलांच्या आरोग्यासाठी चूलमुक्त अभियान राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान केल्याचे पूनम महाजन म्हणाल्या.

बोलताना खासदार पूनम महाजन
बोलताना खासदार पूनम महाजन

चंद्रपूर- माझ्या वडीलांनी सांगीतले होते की विकासाची लक्ष्मी घरा-घरात पोहचवायची आहे. टाटा-बाय हाताच्या पंज्यात लक्ष्मी वसत नाही. जंगलात फिरणाऱ्या धनुष्यबाणावर सुद्धा लक्ष्मी वसत नाही आणी ज्यांच्या घडाळ्याचे बारा वाजले आहेत त्यांचे बद्दल काय बोलायचे. लक्ष्मी फक्त कमळाच्या फुलावरच वसते त्यामूळे विकासाची लक्ष्मी कमळच घराघरात पोहचवू शकते, असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी केले.

हेही वाचा - क्रिकेटच्या वाघाचा ताडोबाला निरोप

चिमूर तालुका महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक सभागृह, चिमूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार पूनम महाजन बोलत होत्या.

यावेळी बोलताना खासदार पूनम महाजन म्हणाल्या, प्रमोद महाजन यांनी भाजपचा वटवृक्ष वाढवत असताना याच चिमूर शहरात एका सभेत 5 कार्यकर्त्यांपासून सुरू केलेले भाषण आज त्यांची मुलगी म्हणून 50 हजार कार्यकर्त्यांना संबोधत आहे. भाजपचे विचार वाढविण्याचे काम केल्याने, हजारोंच्या संख्येने आलेल्या महिला भगिनी हीच या भाजपची ताकत आहे. महिलांच्या आरोग्यासाठी चूल मुक्त करण्याचे धोरण व स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महिला कशा सक्षम राहतील यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करत विविध योजना दिल्या. त्यामुळे महिलांना सन्मान मिळाल्याचे त्या म्हणाल्या.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बंटी भांगडीया म्हणाले, आम्ही राजकारण करत असताना मातृशक्तीचे प्रेम जपले यामुळे या मतदार संघात दोन वेळा भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चिमूरला न्याय मिळाला नाही. पण, 2014 मध्ये केंद्र व राज्यातील भाजप सरकारने चिमूर मतदार संघासाठी भरीव निधी देत चौफेर विकास केला. शिवसेनेने स्वतःची पोळी भाजण्यासाठी विरोधी विचारसरणीसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोपसुद्धा आमदार भांगडीया यांनी केला.

हेही वाचा - राजुरा पोलीस ठाण्यातील शिपायाची विष पिऊन आत्महत्या?

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूरचे आमदार बंटी भांगडीया, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रेखा कारेकर, भाजप महिला आघाडी प्रदेश महामंत्री माजी महापौर अर्चना डेहनकर, वसंत वारजूकर, भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रेणुका दुधे, सामाजिक कार्यकर्त्या मेघा भांगडीया, अपर्णा भांगडीया, नगरसेवक शिल्पा राचलवार यांसह आदी उपस्थित होते .

हेही वाचा - जिल्ह्यात 'शिवभोजन' योजनेची सुरुवात, चव न चाखताच परतले पालकमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details