महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचे काम मी तळागळापर्यंत नेले, म्हणून विजय निश्चित - सुभाष धोटे - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक आघाडी राजुरा विधानसभा क्षेत्रातून मिळाली होती. हेच चित्र या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली.

माजी आमदार सुभाष धोटे

By

Published : Oct 16, 2019, 12:00 PM IST

Updated : Oct 16, 2019, 1:37 PM IST

चंद्रपूर -राजुरा विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेस पक्षासाठी अनुकूल राहिला आहे. पक्षाचा विचार तळागळातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. म्हणूनच येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आहे.

काँग्रेसचे काम मी तळागळापर्यंत नेले - सुभाष धोटे


याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसला जिल्ह्यातून सर्वाधिक आघाडी राजुरा विधानसभा क्षेत्रातून मिळाली होती. हेच चित्र या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली.

हेही वाचा - विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा


आपण आमदार असताना संपूर्ण विधानसभा क्षेत्रात भरीव कामगिरी केली. मात्र, त्यानंतर भाजपच्या आमदारांनी ही कामे रखडून ठेवली आहेत, असा आरोप सुभाष धोटे यांनी केला.
राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपने विद्यमान आमदार अॅड. संजय धोटे, शेतकरी संघटनेकडून अॅड. वामनराव चटप आणि काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्यात लढत आहेत.

Last Updated : Oct 16, 2019, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details