महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 28, 2020, 5:25 PM IST

ETV Bharat / state

'येथे' लखलखत्या निखाऱ्यांवरून भक्त चालतात अनवाणी

मध्यरात्री सुरू होणारा 'अग्नीकुंड प्रभावळी'चा सोहळा अग्नी शांत होईपर्यंत सुरू असतो. अग्नी कुंडातील निखाऱ्यांवरून चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अग्नीकुंड प्रभावळीचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यातील भाविक मोठी गर्दी करतात.

Devotees walk on burning coal
चंद्रपूर

चंद्रपूर- संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लखलखत्या निखाऱ्यांनी तुडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालतात. वयोवृद्ध, लहान आणि महिलाही या अग्नीकुंडातून चालत जातात. अग्नी कुंडातील निखाऱ्यांवरून चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

निखाऱ्यांवरून भक्त चालतात अनवाणी

महाराष्ट्र-तेलंगणातील आराध्य दैवत असलेल्या संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव संतनगरीत सुरू आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे 'अग्नीकुंड प्रभावळी'चा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खोदला जातो. त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची विधीवत पूजा केली जाते. त्यानंतर मग लखलखत्या निखाऱ्यांवरून चालत भाविक पुढे जातात.

हेही वाचा -यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

मध्यरात्री सुरू होणारा अग्नीकुंड प्रभावळीचा सोहळा अग्नी शांत होईपर्यंत सुरू असतो. अग्नी कुंडातील निखाऱ्यांवरून चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अग्नीकुंड प्रभावळीचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तीन्ही राज्यातील भाविक मोठी गर्दी करतात.

हेही वाचा -कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'

ABOUT THE AUTHOR

...view details