चंद्रपूर-सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना विहिरगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात वाघाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.
जिल्ह्यातील राजूरा (मध्य) चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या विहिरगाव बिटातील सर्व्हे नंबर ३३६ मध्ये चूनाळा गावातील उद्धव मारोती टेकाम हे सरपण गोळा करायला गेले. सरपण गोळा करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकाम यांचे शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. हल्ल्याची ही घटना शनिवारी सकाळी घडली.
वाघाला जेरबंद करा अन्यथा आंदोलन: