महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मार्गदर्शन सूचनांबाबत कर्मचाऱ्यांतच स्पष्टतेचा अभाव, अतिउत्साहींमुळे तातडीच्या सेवा देणाऱ्यांना त्रास - coronavirus fear

संचारबंदीमधून वगळण्यात आलेल्या तातडीची सेवा देणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अतिउत्साही नागरिकांमुळे यामध्ये आणखी जास्त गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलीस 'प्रसादही' देत आहेत.

मार्गदर्शन सूचनांबाबत कर्मचाऱ्यांतच स्पष्टतेचा अभाव
मार्गदर्शन सूचनांबाबत कर्मचाऱ्यांतच स्पष्टतेचा अभाव

By

Published : Mar 25, 2020, 11:17 AM IST

Updated : Mar 25, 2020, 12:16 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात लागलेल्या संचारबंदीमुळे सर्वत्र चांगला परिणाम दिसत आहे. काही ठिकाणी अतिउत्साही नागरिकांकडून याची पायमल्ली होताना दिसत आहे. यामुळे पोलिसांना अनेकदा बळाचा वापर करावा लागत आहे. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांच्या स्पष्टतेचा अभाव पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. यामुळेही अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.

संचारबंदीमधून वगळण्यात आलेल्या तातडीची सेवा देणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अतिउत्साही नागरिकांमुळे यामध्ये आणखी जास्त गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलीस 'प्रसादही' देत आहेत.

मार्गदर्शन सूचनांबाबत कर्मचाऱ्यांतच स्पष्टतेचा अभाव, अतिउत्साहींमुळे तातडीच्या सेवा देणाऱ्यांना त्रास

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागरिक याबाबत तितकेसे जागरूक नाहीत. त्यामूळेच राज्यात संपुर्ण संचारबंदी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनीही याबाबत निर्देश दिले आहेत. याचे पालन न करणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे. यानंतर पोलीस यंत्रणेने सुद्धा अनेक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे.

वृत्तपत्र प्रतिनिधी, आरोग्यसेवा देणारे कर्मचारी, मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच अन्य तातडीची सेवा देणारे नागरिक हे अपवाद वगळता सर्वांना संचारबंदीचा नियम लागू आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांकडून अशा तातडीची सेवा देणार्‍या कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्याच्या काही घटना घडत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांबाबत स्पष्टतेचा अभाव दिसून येत आहे. सोबतच काही अतिउत्साही नागरिकांकडून देखील या संचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे. अशांवर कठोर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा - Coronavirus : घराबाहेर पडू नका, नागपूर पोलिसांचे जनेतेला आवाहन

हेही वाचा - विरारच्या कोपरी गावातील नागरिकांची अनोखी संचारबंदी

Last Updated : Mar 25, 2020, 12:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details