चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील धोपटाळा येथे आगलेल्या आगीत गुरांचे सहा गोठे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत दोन बकऱ्यांसह, वासरू, चार कोंबड्या, बारा क्लिंटर कापसासह दोन दुचाकी जळाल्या.
आगीत गुरांचे सहा गोठे खाक, लाखोंचे नुकसान - corona latest news
चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना गावात 6 गुरांचे गोठे आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
कोरपना तालुक्यातील धोपटाळा येथे सोमवारी दहाच्या सुमारास घरांना लागून असलेल्या एकाच परिवारातील गुरांच्या गोठ्याना अचानक आग लागली. बघता बघता आग भडकली अन सहा गोठे आगीच्या भडक्यात सापडल्याने जळून खाक झाले. जळालेले गोठे मुरलीधर केशव बोबडे, मनोहर केशव बोबडे, दशरथ अर्जुन बोबडे, दिवाकर विठ्ठल बोबडे, महादेव विठ्ठल बोबडे, विजय अर्जुन बोबडे यांच्या मालकीचे होते. या आगित सहा बकऱ्या, दोन वासरे, एक म्हशीचे पिल्लू, चार कोंबड्या, 24 क्लिंटल कापुस, दोन दूचाकी, जनावरांचा चारा आणि इतर साहीत्य जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. आग लवकरच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.