महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता.. पहा दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या

गेली काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा जोर धरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास संमती दिली आहे. नागपूर शहर बस सेवेच्या काही बस स्थानकांसह अन्य ठिकाणी आक्षेपार्ह मजकुरासह कागद चिटकवण्यात आले आहेत. मोदी शाह जोडगोळीला देशातील लोकशाही संपुष्टात आणायची असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी केले आहे. चिमुर तालुक्यातील मेटेपार गावात तीन वाघांचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

By

Published : Jul 8, 2019, 2:04 PM IST

बुलेटिन

मुंबईसह उपनगरात पुन्हा जोरदार पाऊस; वाहतुकीवर परिणाम

मुंबई - गेली काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा जोर धरला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. मुंबईसह उपनगरात सर्वत्र पाऊस पडत आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्येही पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरची उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.वाचा सविस्तर...

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची संमती

नवी दिल्ली -सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास संमती दिली आहे. १२ जुलैला यावर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिली होती. या निर्णयाने मराठा समाजाला शिक्षणात १३ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १२ टक्के आरक्षण देण्यात आले होते.वाचा सविस्तर...

खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरीत आरक्षण द्या; अन्यथा कुटुंबीयांना बॉम्बने उडवू, सरकारला धमकी

नागपूर- शहर बस सेवेच्या काही बस स्थानकांसह अन्य ठिकाणी आक्षेपार्ह मजकुरासह कागद चिटकवण्यात आले आहेत. यात भारत सरकार तसेच भारतात कार्यरत सर्व कंपन्यांना उद्देशून धमकी देण्यात आली आहे. या धमक्यांमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते, मात्र पोलिसांनी हे सर्व कागद आपल्या ताब्यात घेतले असून ही पत्रके कोणी लावली, याचा तपास पोलीस करत आहेत.वाचा सविस्तर...

कर्नाटकातील ऑपरेशन कमळमध्ये फडणवीस सरकारही सामील, सचिन सावंतांचा निशाणा

मुंबई -मोदी शाह जोडगोळीला देशातील लोकशाही संपुष्टात आणायची असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी केले आहे. कर्नाटक सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन कमळमध्ये फडणवीस सरकारही सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या अनेक महिन्यात राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याच्या बंगल्यावर यासंदर्भात बैठका झाल्या असल्याचेही सावंत म्हणाले. वाचा सविस्तर...

धक्कादायक.! चंद्रपुरात तीन वाघांचा मृत्यू, विषप्रयोग झाल्याचा संशय

चंद्रपुर- चिमुर तालुक्यातील मेटेपार गावात तीन वाघांचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा समावेश असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. राज्यभरात 29 जुलैला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची जोरदार तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details