नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानातील बालाकोटमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'देश सुरक्षित हातांमध्ये आहे, हा विश्वास मी देशातील तमाम जनतेला देऊ इच्छितो, असे सांगत, माझं वचन आहे, की देशाची मान झुकू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. ते राजस्थान येथील चुरू येथे आयोजित सभेत बोलत होते.
देशाची मान झुकू देणार नाही; चुरूच्या सभेत मोदींचे वक्तव्य - solider
पंतप्रधान मोदी यांनी स्थानिकांना अभिवादन करत आजच्या सभेची सुरुवात केली. मोदी पुढे म्हणाले, मी तुमचा हा उत्साह समजू शकतो. देशाच्या पराक्रमी वीरांना नमन करण्याची ही संधीच आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
![देशाची मान झुकू देणार नाही; चुरूच्या सभेत मोदींचे वक्तव्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2557470-1013-b4ba6bfd-6244-4356-8495-e273b7b9caae.jpg)
नरेंद्र मोदी
देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत, यामध्ये चुरू आणि राजस्थानातील ५० लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असून, रस्ते, वीज यासह विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी स्थानिकांना अभिवादन करत आजच्या सभेची सुरुवात केली. मोदी पुढे म्हणाले, मी तुमचा हा उत्साह समजू शकतो. देशाच्या पराक्रमी वीरांना नमन करण्याची ही संधीच आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.