महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2019, 5:37 PM IST

ETV Bharat / state

आझाद हिंद संघटनेच्या सतीशचंद्र रोठेंनी मुख्यमंत्री पदाची प्रतिकात्मक शपथ घेऊन व्यक्त केला निषेध

शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबद शासनाची उदासिनता पाहता आझाद हिंद संघटनेने सर्वच राजकीय पक्षांचा निषेध नोंदवला. तर, शुक्रवारी सायंकाळी. ५.०० वाजता आझाद हिंद संघटनेचे अ‌ॅड. सतीश रोठे यांनी प्रतिकात्मक मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच अँड. रोठे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी बळीराजाप्रती संवेदना प्रगट केल्या.

सतीशचंद्र रोठेंनी मुख्यमंत्री पदाची प्रतिकात्मक शपथ घेऊन व्यक्त केला निषेध

बुलडाणा -यंदा राज्यासह जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला. शेतपिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. तर, सामान्य जनतेलाही या अतिवृष्टीच्या फटका बसला. शेतकरी पार कोलमडून पडला असताना शासन-प्रशासनाने पंचनाम्यांचे फक्त भूत उभे केले आहे. मात्र, मदतीकरता कोणीही पुढे आले नाही, असे म्हणत आझाद हिंद संघटनेने आपला निषेध व्यक्त केला. तर, या संघटनेचे संस्थापक अ‌ॅड. सतीशचंद्र रोठेंनी यावेळी निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री पदाची प्रतिकात्मक शपथ देखील घेतली.

सतीशचंद्र रोठेंनी मुख्यमंत्री पदाची प्रतिकात्मक शपथ घेऊन व्यक्त केला निषेध

अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानभरपाईची मागणी करताना शेतकऱ्यांचे जीव टांगणीला लागला असताना शासन-प्रशासन मात्र पंचनाम्याचे चित्र उभे करत आहे. आता तर राष्ट्रपती राजवट लागली असून यामूळे नेते सत्तास्थापनेत दंग तर शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र सध्या आहे. नविन सरकार आल्यास बळीराजाला मदत मिळेल, अशी अपेक्षा असताना मात्र नविन सरकार येणार कधी हा सुद्धा प्रश्न आहे. याप्रकरणी आझाद हिंद संघटनेने सर्वच राजकीय पक्षांचा निषेध नोंदवला. तर, शुक्रवारी सायंकाळी. ५.०० वाजता आझाद हिंद संघटनेचे अ‌ॅड. सतीश रोठे यांनी प्रतिकात्मक मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

हेही वाचा - ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज

शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे जग जाहीर आहे. मात्र, असे असतानाही फडणवीस सरकारने पंचनाम्यांचे निव्वळ भूत उभे केले असल्यामुळे येथेच बळीराजाचे अर्धे खच्चीकरण झाले. आता पंचनामे झाले असले तरी राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे. मात्र, पीक कर्जाचा मेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वालीच नसल्याचा आरोपही रोठे यांनी यावेळी केला. तसेच, रोठे यांनी शासन तयार होऊ न शकल्याने प्रतिकात्मक निषेध व्यक्त करीत मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली.

हेही वाचा - परतीच्या पावसाचा फटका; भाज्यांना महागाईची फोडणी, गृहिणींचे बजेट कोलमडले

ABOUT THE AUTHOR

...view details