महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2022, 10:04 PM IST

ETV Bharat / state

Minister Bhagwat Karad - भारत जोडो यात्रा नावापुरतीच, ही भाजप जोडो यात्रा - केंद्रीय मंत्री भागवत कराड

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ( Bharat Jodo Yatra in Maharashtra ) दाखल झाली असून या भारत जोडो यात्रेवर बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड ( Union State Minister Bhagwat Karad ) यांनी हल्ला बोल केला आहे.ते म्हणाले की, राहुल गांधीच्या भारत जोडा यात्रा सुरू झालेली आहे आणि ती आता महाराष्ट्रात सुद्धा आलेली आहे. पण राहुल गांधी ( Rahul Gandhi ) जेवढे फिरतील तेवढा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

बुलढाणा : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ( Bharat Jodo Yatra in Maharashtra ) दाखल झाली असून या भारत जोडो यात्रेवर बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड ( Union State Minister Bhagwat Karad ) यांनी हल्ला बोल केला आहे.ते म्हणाले की, राहुल गांधीच्या भारत जोडा यात्रा सुरू झालेली आहे आणि ती आता महाराष्ट्रात सुद्धा आलेली आहे. पण राहुल गांधी ( Rahul Gandhi ) जेवढे फिरतील तेवढा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड माध्यमांशी बोलताना

भारत जोडो यात्रा नसून भाजप जोडो यात्रा - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही नावापुरतीच आहे. ही खरंतर भाजप जोडो यात्रा म्हणता येईल, कारण राहुल गांधी हे त्यांच्याच पक्षाचे नुकसान करतात. ते काय विधान कुठे करतात आणि ते काय बोलतील, असं नक्की तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल.

राहुल गांधीमुंळे भाजपाला मदत - आतापर्यंतचा इतिहास आहे ज्या ज्या राज्यात राहुल गांधी गेले त्या त्या राज्यात काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही पुढ आलेली आहे. भारतीय जनता पार्टीला याचा फायदा झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे आज बुलढाणा येथे विदर्भ वंजारी सेवा परिषद यांच्यावतीने आयोजित वंजारी समाज मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमास आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details