महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी'

पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ऐनवेळी दिलीपकुमार सानंदा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा पक्षाकडे लिखित स्वरुपात केला आणि उमेदवारी नाकारली होती.

By

Published : Oct 7, 2019, 2:19 PM IST

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

बुलडाणा -खामगाव विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून आपण उमेदवारी नाकारली. मात्र, पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिल्यानंतरही ती सानंदा यांनी नाकारली होती. यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी प्रथमच बोलत होते. मागील तीन पंचवार्षिकमध्ये विजय संपादन करणारे काँग्रेसचे आमदार सानंदा यांना 2014 मध्ये 3700 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाच वर्षात सानंदा यांनी मतदारसंघातील जनतेशी ठेवलेला संपर्क आणि पक्षासाठी केलेले आंदोलने पाहता त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे चित्र होते. ऐनवेळेवर दिलीपकुमार सानंदा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा पक्षाकडे लिखित स्वरुपात केला आणि उमेदवारी नाकारली. यामुळे खामगाव मतदारसंघांमध्ये काय होईल? या चर्चेला संपूर्ण जिल्हाभरात उधाण आले होते.

हेही वाचा -मी काँग्रेस सोडणार नाही, आमदार बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

असे असताना सानंदा यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाशी संबंधित असलेले गणेश घराण्यातील ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नावाची शिफारस करून मतदारसंघातील राजकारणात मोठी उलट फेर करून दिली. त्यामुळे भाजपाचे आमदार अ‌ॅड. आकाश फुंडकर यांच्याविरुद्ध काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील यांची लढत तुल्यबळ होईल, असे मानले जात आहे. अशावेळी सानंदा यांनी प्रथमच प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन पक्षाने दिलेला उमेदवारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असून त्यासाठी सर्वस्व पणाला लावले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीकाही केली.

ABOUT THE AUTHOR

...view details