महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढणार - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

शनिवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी खामगाव येथील त्यांच्या नातेवाईकांसह भाजपाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांचे निवासस्थानी भेट दिली.

By

Published : Jul 8, 2019, 9:40 AM IST

यावेळी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा सत्कार करण्यात आला.

बुलडाणा - राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे शनिवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी ते खामगाव येथे असताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आपण या सर्व समस्या तत्काळ निकाली काढणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिलीपकुमार सानंदा यांना दिले.

शेतकऱ्यांच्या समस्या तात्काल निकाली काढणार - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

शनिवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी खामगाव येथील त्यांच्या नातेवाईकांसह भाजपचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांचे निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, ते त्यांचे नातेवाईक सातपुते यांच्या निवासस्थानी आले असता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेतली. खामगाव नगरीत प्रथमच आल्याबद्दल त्यांचे स्वागत सत्कार केला. यावेळी सानंदा यांनी खामगाव आणि शेगाव येथील कृषी कार्यालयांमध्ये हे कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर त्यांनी सांगितले की, नुकतीच नवीन भरती करण्यात आलेली आहे. विदर्भाबाहेरील अधिकारी आणि कर्मचारी परत जाण्यासाठी बदल्या मागत आहेत. मात्र, मी माझ्या विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कुणाचीही बदली करू नये व ज्याची बदली झाली त्याला रिलीव्ह करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आता सुटतील, असेही त्यांनी सांगितले.

नुकतेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात २० हजार रुपयांची नाणी चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात दहा आणि पाच रुपयांची नाणी शेतकऱ्यांकडून कुणी स्वीकारत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. ही बाबही सानंदा यांनी कृषिमंत्री बोंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आपण माहिती ती घेऊन योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नाण्याच्या प्रश्नावर कृषिमंत्र्यांचे उत्तर.. माहिती नाही -

शेतकऱ्यांकडून दहा आणि पाच रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यावर आपण कारवाई करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर आपल्याला या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details