महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2019, 2:17 PM IST

ETV Bharat / state

बुलडाणा : पंचनामे पूर्ण होऊनही सरकार स्थापन न झाल्याने नुकसानभरपाई रखडली

सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यातील सव्वा सहा लाख हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून साडेसहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

बुलडाणा -जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. प्रशासन स्तरावर पंचनामे पूर्ण होत आले असले तरी सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील सव्वा सहा लाख हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून साडेसहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
यंदा परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. भिजलेली आणि कुजलेली सोयाबीन कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही शेतात ट्रॅक्टर, मळणीयंत्र जाऊ शकत नसल्याचे चित्र आहे. पीके काढणीला आली असताना संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. आर्थिक नुकसान झाल्याने रब्बीची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विमाकंपन्या नुकसान भरपाई देणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना सुद्दा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती.

हेही वाचा -ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज

ज्या सरकारकडे मदत मागायची आहे ते सरकारच अद्याप स्थापन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान कित्येक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. आपले अनुदान जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी शेतऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details