भंडारा -सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढत आहेत. शनिवारी ही यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. मात्र, या सभेनंतर संकुलातील क्रीडांगणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे क्रीडांगणावर सराव करणाऱ्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात २ आणि ३ ऑगस्टला झालेल्या पावसामुळे क्रीडांगणामध्ये ठिकठिकाणी पाणी साठले होते. त्यामुळे सभास्थळावर पोहचण्यासाठी वाळू आणि वादारीचा कच्चा रोड बनविण्यात आला. तसेच शामियानाच्या आतील चिखल झाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मैदानावर वाळू टाकण्यात आली. यामुळे मैदानाची दुर्दशा झाली होऊन खेळाडूंचा सराव थांबला आहे.