भंडारा -राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजपासोबत गटबंधन केले. त्यामुळे आम्ही आज त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, असा गौप्यस्फोट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी आज भंडारा येथे केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी ( Bhandara ZP President Election ) झालेल्या निवडणुकी नंतर ते माध्यमांशी बोलत ( Nana Patole on NCP ) होते. भंडारा जिल्हा परिषदमध्ये 52 पैकी 21 जागा जिंकून कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. मात्र अध्यक्ष पद मिळवण्यासाठी त्यांना आणखी 5 सदस्यांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी भाजपाचे नाराज नेते आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील 5 आपल्या सोबत घेऊन अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली.
नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'आम्ही मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यान भाजपशी हात मिळवणी करीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. गोंदिया आणि भंडारामध्ये ज्या पद्धतीने भाजपा सोबत राष्ट्रवादी सत्ता स्थापन करीत आहे. त्यावरून राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट होत आहे.
...आणि सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाला - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षानी सत्ता स्थापनेसाठी दावेदारी प्रस्तुत केली असून ह्यासाठी आपल्या राजकीय वैरीभाजपची मदत घ्यायला दोन्ही पक्ष समोर आले होते. विशेष म्हणजे भाजपचा एक गट हा काँग्रेसचा जवळीक आहे. तर दूसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसचा जवळ आहे. काँग्रेसकडे 21 सदस्य आहे त्यांना जर चरण वाघमारे यांचे गटातील 5 सदस्यांनी मदत केली त्यामुळे त्यांचे संख्याबळ 26 झाले आणि त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाला. आम्ही भाजपाशी कधीही युती केली नाही, आज आम्ही चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशनच्या सोबत केले असून भाजपाने त्यांच्यावर अन्याय केल्यानेच ते आज आमच्या सोबत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.