महाराष्ट्र

maharashtra

भात लावणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता, या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता

भंडारा जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झाल्या आहेत. पऱ्यांची (भाताची रोपे) लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

By

Published : Jul 26, 2019, 9:27 PM IST

Published : Jul 26, 2019, 9:27 PM IST

भात लावणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता

भंडारा - मागील २५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून जिल्ह्यात पुनरागमन केले. मात्र रोवणीयोग्य पाऊस अजूनही बरसलेला नाही. पुढच्या तीन-चार दिवस पाऊस सुरू राहिला तरच रोवणीला सुरुवात होईल. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झाल्या आहेत. तसेच पऱ्यांच्या (भाताची रोपे) लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भात लावणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता
29 जून पासून भंडारा मध्ये पावसाचे आगमन झाले होते. त्याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली होती. मात्र मागच्या 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे परे करपले होते. गुरुवारी पावसाचे पुनरागमन झाल्याने पऱ्यांना एक नवीन जीवदान मिळाले आहे. असे असले तरी लावणी करण्यासाठी लागणारा पाऊस अजून झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 50 टक्केच पाऊस झालेला आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. पेरणीच्या 20 दिवसांनंतरचे परे हे लावणीसाठी योग्य असतात. या पऱ्यांमुळे उत्पादन चांगले मिळते. या वर्षी पावसाने दडी मारल्याने पऱ्यांचे वय वाढले आहे. परे आता 20 ते 25 दिवसांचे झाले आहेत. ज्यास्त दिवसांचे परे शेतकऱ्यांनी लावू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details