महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी; चरण वाघमारेंचे धरणे आंदोलन - ex mla charan waghmare agitation

महाविकासआघाडी सरकारमधील समाविष्ट पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची अजूनपर्यंत पूर्तता झाली यामुळे माजी आमदार चरण वाघमारे यांनी आंदोलन केले.

ex mla charan waghmare agitation over farmers issue
सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी; चरण वाघमारेंचे धरणे आंदोलन

By

Published : Dec 17, 2019, 11:27 AM IST

भंडारा -तुमसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या विकास आघाडी फाउंडेशनतर्फे मोहाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा आयोजन केले होते. सत्तेत येण्यासाठी जी आश्वासने सध्याच्या सत्ताधारी लोकांनी दिली होती, त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली.

सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी; चरण वाघमारेंचे धरणे आंदोलन

हेही वाचा - 'सावरकरांवर खरंच प्रेम असेल तर गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा'

महाविकासआघाडी सरकारमधील समाविष्ट पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची होती. पीक विम्याची रक्कम शासन निर्णयाप्रमाणे दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. विलंब झाल्यास विम्याच्या रकमेसह व्याज देण्याचे बंधनकारक असूनही मागील पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने व्याजासहित ही रक्कम अदा करावी. सरकारमध्ये समाविष्ट लोकप्रतिनिधीही अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.

काय आहेत मागण्या ?

निवडणुकीच्या काळात नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला प्रति क्विंटल 3 हजार रुपये दर घोषित करावे. सिंचनाच्या सोयीकरता प्रलंबित असलेले कृषी पंपाचे विद्युत, सौर ऊर्जा जोडणी तत्काळ देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना अठरा तास विद्युत पुरवठा करण्यात यावा आणि कृषी पंपाचे थकित बिल माफ करावे इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मोहाडी तहसीलदारांनी आंदोलन स्थळावर येत निवेदन स्वीकारले.

हेही वाचा -'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details