महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 18, 2019, 11:05 AM IST

ETV Bharat / state

मांजरा धरणातून लातूरला होणारा पाणीपुरवठा 1 ऑक्टोंबरपासून होणार बंद

मांजरा धरणातून लातूरसह बीड, उस्मानाबाद होणार पाठीपुरवठा १ ऑक्टोंबर पासू बंद होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बैठक घेऊन सांगीतले. यामुळे लातूर शहराला पुन्हा रेल्वेने पाणी देण्याची परस्थिती ओढवली आहे.

बीड -पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटले तरी देखील पाऊस पडत नसल्याने बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मांजरा धरण कोरडे पडले आहेत. त्यावर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना धरणातून होणारा पाणीपुरवठा ऑक्टोंबर पासून बंद करण्याचा निर्णय लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे लातूर शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणी देण्याची परस्थिती ओढवली आहे.

मांजरा धरण

दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. बीड जिल्ह्यातील 144 सिंचन प्रकल्पापैकी 109 सिंचन प्रकल्प आजही कोरडेठाक पडले आहेत. परतीच्या पावसावरच या सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. केज तालुक्यातील मांजरा धरण धरणातून लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र, या धरणातील पाणी संपले आहे. त्यामुळे 1 ऑक्टोंबर पासून लातूर शहरासह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील गावांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी श्रीधर यांनी बैठक घेऊन सांगितले आहे.

काळवटी साठवण तलावावरच मदार -

अंबाजोगाई शहराला पाणीटंचाईचे ग्रहण लागले असून मांजरा धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर काळवटी साठवण तलावा वरूनच अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस झाला तर तरच मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, जिल्ह्याची तहान भागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details