महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेवराईच्या आमदारांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच वाऱ्यावर सोडले - विजयसिंह पंडित - maharshtra assembly election

आपल्या भागाच्या विकासासाठी मला सेवा करण्याची संधी द्या, विरोधकांच्या भुलथापांना आणि फसव्या आश्‍वासनांना बळी पडू नका. ज्यांना मोठ्या विश्‍वासाने तुम्ही निवडून दिले, त्यांनी सर्वांचा विश्‍वासघात केला आहे. ज्या कार्यकर्त्याने ज्यांच्या आमदारकीसाठी जिवाचे रान केले त्याच कार्यकर्त्यांना विद्यमान आमदारांनी वाऱ्यावर सोडले, मात्र, अशा विश्‍वासघातकी आमदाराला आता कार्यकर्ते सोडणार नाहीत, तर तेच कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील

विजयसिंह पंडित

By

Published : Sep 29, 2019, 10:17 AM IST

Updated : Sep 29, 2019, 12:02 PM IST

बीड- गेवराईच्या भारतीय जनता पक्षात दलालांचा भरणा असून निष्ठावंतांचा विश्‍वासघात केला जात आहे. ज्यांना आमदार करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. त्याच कार्यकर्त्यांना विद्यमान आमदारांनी वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे. मात्र आता तेच कार्यकर्ते करत त्या आमदाराला त्यांची आता जागा दाखवणार असल्याचे टीकास्त्रही त्यांनी यावेळी केले. गेवराई तालुक्यातील चकलांबा सर्कल अंतर्गत सुशी, वडगाव, चिखली, कवडगाव आणि बंगालीपिंपळा आदी गावांच्या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना बोलत होते.

प्रचार, गाठीभेटी वेळी कार्यकर्ते

विजयसिंह पंडित यांनी चकलांबा सर्कलमध्ये विविध गावांचा दौरा करून कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंडित म्हणाले, आपल्या भागाच्या विकासासाठी मला सेवा करण्याची संधी द्या, विरोधकांच्या भुलथापांना आणि फसव्या आश्‍वासनांना बळी पडू नका. ज्यांना मोठ्या विश्‍वासाने तुम्ही निवडून दिले, त्यांनी सर्वांचा विश्‍वासघात केला आहे. ज्या कार्यकर्त्याने ज्यांच्या आमदारकीसाठी जिवाचे रान केले त्याच कार्यकर्त्यांना विद्यमान आमदारांनी वाऱ्यावर सोडले, मात्र, अशा विश्‍वासघातकी आमदाराला आता कार्यकर्ते सोडणार नाहीत, तर तेच कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील असेही ते म्हणाले.

गेवराईच्या आमदारांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच वाऱ्यावर सोडले - विजयसिंह पंडित

या मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत. आता राष्ट्रवादीने विजयसिंह पंडीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

विकासाला साथ म्हणजे विजयसिंहांना साथ - परमेश्‍वर खरात

यावेळी बोलताना पं.स.सदस्य परमेश्‍वर खरात म्हणाले की, शिवाजीराव (दादा) पंडित कुटुंबीयांनी चकलांबा सर्कल आणि परिसराच्या विकासासाठी साथ दिली. दादांचा वारसाच विजयसिंह पंडित पुढे घेऊन चालत आहेत. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. विजयसिंह पंडित यांना साथ म्हणजे विकासाला साथ त्यासाठी विजयसिंह पंडितांना आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले. या दौऱ्यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य परमेश्‍वर खरात, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, कल्याण भोसले, अर्जुन फरताडे, अधिक पवार, कल्याण मुरनर, धर्मराज कोकरे, हिम्मत खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Last Updated : Sep 29, 2019, 12:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details