महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Fake Marriage Gang : खोट्या लग्नाची खरी गोष्ट; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, महाराष्ट्रभर याचे जाळे - बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बीड जिल्ह्यात एक विचित्र घटना घडल्याचे निदर्शनास आले ( True Story of Fake Marriage ) आहे. अनेकांना बनावट लग्न लावून फसवण्याचा प्रकार उघडकीस आला ( Fake Marriage Gang Busted ) आहे. या बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला ( Fake Marriage Gang Network Across Maharashtra ) आहे. महाराष्ट्रभर जाळे असलेल्या या टोळीने अनेकांना गंडा घातला आहे.

True Story of Fake Marriage Fake Marriage Gang Busted, Its Network Across Maharashtra
खोट्या लग्नाची खरी गोष्ट; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, महाराष्ट्रभर याचे जाळे

By

Published : Dec 24, 2022, 2:18 PM IST

बीड : सोलापूरचा नवरदेव मोर्चा गाजत असताना बीड जिल्ह्यामध्ये ( True Story of Fake Marriage ) लग्नाळू पोरांना फसवून, बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले ( Fake Marriage Gang Busted ) आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या टोळीने अनेकांना लाखों रुपयांचा गंडा घातला ( Fake Marriage Gang Network Across Maharashtra ) आहे. याच लग्नातील आई, भाऊ बनावट नाते असल्याची माहिती उजेडात आले आहे. त्यामुळे लग्न करताय, मग जरा सोयरीक तपासून पाहा? असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. पाहुयात खोट्या लग्नाची खरी गोष्ट, नेमकी काय आहे? या विषयीचा एक Etv Bharat चा स्पेशल रिपोर्ट....

नव्या नवरीने पंधरा दिवसांमध्ये दागिन्यांसह धूम ठोकलीबीड जिल्ह्यात गेल्या लग्न करून आलेल्या नव्या नवरीने पंधरा दिवसांमध्ये दागिन्यांसह धूम ठोकल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाणे आणि नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात लग्नाळू पोरांना फसवणारी टोळी कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर हा तपास करताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आधार कार्ड बनावट, नातेही बनावट, आई-वडील आणि भाऊ हेदेखील बनावट, तर एजंटमार्फत हा सर्व लुटीचा खेळ चालायचा एवढे मोठे फ्राॅड पोलिसांनी उघड केले आहे.



अडीच लाख रुपये देऊन लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह गायबअडीच लाख रुपये देऊन लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात नवरदेवाने पकडून बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. बीड जिल्ह्यात 8 दिवसात दोन बनावट लग्नाच्या घटना समोर आल्याने मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसानी व्यक्त केली. या प्रकरणात बीड शहर पोलिस ठाण्यात नवरी सह 7 जणांना अटक केली.नवरी अल्पवयीन निघाली असून, लग्नातील आई, भाऊ बनावट असल्याची माहिती उजेडात आली आहे.

बीड जिल्ह्यात गावागावात लग्न न झालेली शेकडो मुलेबीड जिल्ह्यात गावागावात लग्न न झालेली शेकडो मुले पाहायला मिळत आहेत. त्या मुलांचे पालक लग्नासाठी चिंतेत आहेत, याचीच संधी शोधून गरज पाहून ही टोळी लोकांना लुटत आहे. गुन्हा दाखल झालेले दोन प्रकरणे समोर आले आहेत. मात्र, अशी शेकडो प्रकरण आहेत ज्यामध्ये बदनामी आणि प्रतिष्ठेमुळे समोर येत नाहीत. अस सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी सांगितले



बीड जिल्ह्यात लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी सक्रिय शहरातील एका 32 वर्षीय तरुणाचा विवाह मध्यस्थामार्फत औंढा नागनाथ जि. हिंगोली येथील तरुणीशी जुळवला होता. 3 डिसेंबरला वसमत येथे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लग्न उरकले. त्यासाठी मध्यस्थाने अडीच लाख रुपये घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने करवली म्हणून आलेल्या मीना बळीराम बागल हिच्यासोबत पलायनाचा प्रयत्न केला. मात्र नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अधिक चौकशीत बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा हा कारनामा असल्याचे स्पष्ट झाले.

नवरी अल्पवयीन निघाली असून, तिचे नावही बनावटयातील नवरी अल्पवयीन निघाली असून, तिचे नावही बनावट सांगितल्याचे उघडकीस आले आहे. तिला अंबेजोगाई येथील महिला सुधारगृहात पाठवले आहे. मीना बागल हिची वाढीव कोठडीनंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केलीय. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या 7 झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अशी माहिती तपासी अधिकारी महादेव ढाकणे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details