महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 8, 2020, 11:14 AM IST

Updated : Jun 8, 2020, 11:45 AM IST

ETV Bharat / state

बीड : कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून मृत्यू

परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील खाणीमध्ये साठलेल्या पाण्यात बुडून तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र

बीड - कपडे धुण्यासाठी खाणीवर गेलेल्या दोन मुली व एक मुलगा, असे तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 8 जून) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात घडली.

रेखा (वय 17 वर्षे) आणि सुरेखा दांडेकर (वय 16 वर्षे) या दोन सख्ख्या बहिणी तर रवींद्र (वय 8 वर्षे) हा चुलत भाऊ असे तिघे जण मिळून दाऊतपूर शिवारातील खाणीत कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा खाणीत पडून मृत्यू झाला.

परळी तालुक्यातील दाऊतपूर ते औष्णिक विद्युत केंद्र रोडवर खडीमशिनजवळ छोटीशी खाण आहे. या खाणीत पाणी साठलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीनही मुले परळी येथील थर्मलमधील कामगारांची आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून त्या तिन्ही भावंडांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -तरुणांचा तडफडून मृत्यू प्रकरण; तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

Last Updated : Jun 8, 2020, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details