महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 22, 2021, 4:44 PM IST

ETV Bharat / state

कोरोना रुग्णांसाठी आमदार सुरेश धसांची आष्टीत 'वॉर रुम'; अनेकांना दिला मदतीचा हात

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाची व्यवस्था करताना नातेवाईकांची प्रचंड तारांबळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वॉर रुम सुरू केली आहे.

MLA Suresh Dhas War Room
MLA Suresh Dhas War Room

आष्टी(बीड) - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाची व्यवस्था करताना नातेवाईकांची प्रचंड तारांबळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वॉर रुम सुरू केली आहे. याद्वारे 395 जणांना मदत झाली आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर बेडची पुर्तता तसेच औषधं आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था आमदार धस यांच्या माध्यमातून झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा -13 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सी-60 कमांडोचे पोलीस मुख्यालयात जल्लोषात स्वागत

कोरोना संसर्ग प्रचंड वाढल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिना अनेकांसाठी वेदनादायी ठरला. अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध झाले नाहीत. बेड मिळाले तर ऑक्सिजन नव्हते, ऑक्सिजन असले तर व्हेंटिलेटर नव्हते. अनेकांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होऊ शकला नाही. अशा बऱयाच जणांना उपचार मिळू न शकल्याने जीव गमवावा लागला. एकीकडे शासकीय यंत्रणेचा ताण जास्त वाढल्याने अशा परिस्थितीत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना कोणाची मदत घ्यावी असा प्रश्न निर्माण होत होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मागील सोळा दिवसांपूर्वी वॉर रुमची स्थापना केली होती. 24 तास सेवेत औषधे, बेड, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था, अशा विविध पातळींवर समस्यांचे निरासन करण्यासाठी टीमचे गठण करण्यात आले होते.

10 मे रोजी आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी वॉर रुम करण्यात आली. गेल्या सोळा दिवसात या माध्यमातून 395 जणांना मदत मिळवून देण्यात यश आल्याचा दावा आमदार सुरेश धस हेल्पलाईन प्रमुखांनी केला आहे.

अशी आहे कार्यपद्धती -

आमदार सुरेश धस यांनी आपल्या निवासस्थानी सुरू केलेल्या हेल्पलाईनचा क्रमांक 8446 12 4024 हा आहे. या क्रमांकवर संपर्क साधल्यानंतर संबंधित रुग्णांची असलेली अडचणीची नोंद घेतली जाते. त्यानंतर संबंधित रुग्णांना एक तासाच्या आत असलेली अडचण उदा. बेड, रुग्णवाहिका, रेमडेसिवीर इंजेक्शन, सिटी स्कॅन यासह प्रश्न या हेल्पलाईनच्या माध्यमातून सोडवले जातात.

16 दिवसात साधला 395 जणांनी संपर्क

10 मे पासून सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून आतापर्यंत 395 जणांनी संपर्क साधला आहे. या संपूर्ण सेवाकार्यात 187 जणांना बेड, 195 रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन, 35 जणांना रुग्णवाहिका तर आष्टी आणि मुर्शदपूर भागात बेवारस रुग्ण म्हणजे एकदा उपचारासाठी आणून रुग्णालयात सोडले आणि नातेवाईक फिरकलेच नाहीत अशा 8 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकूण सोळा दिवसात 395 जणांचे हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावले आहेत.

हेही वाचा -साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

ABOUT THE AUTHOR

...view details