महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 2, 2019, 9:40 AM IST

ETV Bharat / state

मतदारांना उल्लू बनवू नका - विजयसिंह पंडित

विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये आपल्या 'कॉर्नर बैठकांचा' धडाका लावला आहे. मतदारांशी थेट संवाद साधताना ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी मोठा विकास निधी खेचून आणला. तालुक्याला नेहमीच झुकते माप दिलेले आहे. तो विकास मतदारांना दिसतो आहे. विरोधकांचा विकास मात्र अद्यापही अदृश्यच आहे.

मतदारांना उल्लू बनवू नका - विजयसिंह पंडित

बीड- आमदारांचा विकास म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने’ असा आहे. त्यांनी मतदारांना ग्रृहीत धरू नये. जनतेने ठरवले आहे, आता बदल करायचा आहे. केलेल्या विकासकामांवर बोलूनच मी मते मागत आहे. मला आता विधानसभेत काम करण्याची संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले आहे. आपल्या ठिकठिकाणच्या कॉर्नर बैठकीत ते मतदारांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये आपल्या 'कॉर्नर बैठकांचा' धडाका लावला आहे. त्यांच्या कॉर्नर बैठकांना प्रचार सभांचे स्वरुप प्राप्त होत आहे. मतदारांशी थेट संवाद साधताना ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी मोठा विकास निधी खेचून आणला. तालुक्याला नेहमीच झुकते माप दिलेले आहे. तो विकास मतदारांना दिसतो आहे. विरोधकांचा विकास मात्र अद्यापही अदृश्यच आहे. आम्ही केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहे. दरम्यान विकासाची आणि जमेची बाजू उपस्थितांना पटवून देत असल्याने मतदारांमधून विजयसिंह पंडित यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

हेही वाचा-संदीप क्षीरसागर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

विरोधकांकडे विकासावर बोलण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही. त्यांनी आता जनतेला उल्लू बनवण्याचे काम करू नये. सुजान मतदार आता त्यांच्या अफवांना आणि फसव्या घोषणांना बळी पडणार नाहीत. पाच वर्षांत काय विकास कामे केली ते त्यांनाच माहित नाही. केवळ स्वतःच्या बगलबच्चांना गडर करण्यासाठी शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकून करोडो रुपयांची खिरापत वाटप केली. विकासापासून तालुका गेल्या पाच वर्षांत कोसो दूर गेला आहे.

हेही वाचा-अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारे प्रत्यक्ष मदतीसाठी भाजपात गेले -धनंजय मुंडे

आपल्या सत्तेच्या काळात त्यांनी शहराला रोल मॉडेल का बनवले नाही ? दत्तक घेतलेली गावे वाऱ्यावर सोडली. आणि आता त्यांचे पुतणा-मावशीचे प्रेम उफाळून येवू लागले आहे. मतदारांना गाजर दाखवण्याचे काम आमदारांनी करू नये. त्यांना ते शोभत नाही. मतदार राजा आता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. मतदारांनीच ठरवले आहे, आता राष्ट्रवादीचा विजय घडवून आणायचा. असा निश्‍चय व्यक्त करून ते म्हणाले की, एकदा मला संधी द्या, मतदारांना आत्तासारखी पश्‍चाताप करायची वेळ येवू देणार नाही, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details