महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू - औरंगाबाद अपघात

दूध घेऊन जाणाऱ्या पिकअपच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. राजेंद्र शंकर भादवे असे मृत तरुणाचे नाव आहे. बीड बायपास रोडवरील आडगाव पुलाजवळ हा अपघात घडला आहे.

औरंगाबाद : भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
औरंगाबाद : भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

By

Published : Nov 9, 2021, 11:51 AM IST

औरंगाबाद : दूध घेऊन जाणाऱ्या पिकअपच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. राजेंद्र शंकर भादवे असे मृत तरुणाचे नाव आहे. बीड बायपास रोडवरील आडगाव पुलाजवळ हा अपघात घडला आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र शंकर भादवे वय २४ रा. गणोरी, ता. फुलंब्री असे मृताचे नाव आहे. राजेंद्र हा त्याच्या चारचाकी गाडीतून बीड बायपासवरून जात असताना आडगाव पुलाच्या जवळ दूध घेऊन जाणाऱ्या पिकअपची त्याच्या गाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात राजेंद्रच्या चारचाकीचा समोरचा भाग चक्काचूर झाला. यात राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. दूधाच्या पिकअपच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत राजेंद्रला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. राजेंद्रवर गणोरी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेची चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

वन वे असल्याने अपघात
"नवीन बीड बायपासवर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले आहेत. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. तरीही वन वे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details