महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ShivSena Closeness to Muslim Brothers : मुख्यमंत्र्यांनी सभेत मुस्लीम समाजाविषयी मांडली भूमिका; त्यामुळे चर्चेला उधाण - The Role Played by Minorities

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद सभेत (Aurangabad Sabha) मुस्लीम समाजाविषयीची आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी केलेले वक्तव्य हे शिवसेना आपल्या भूमिका बदलत आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत आहे. विशेषतः मुस्लिम बांधवांचा द्वेष करण्याची शिकवण नसल्याचे (Shiv Sena Does Not Hate Muslim Brothers ) त्यांनी सांगितलं. ही भूमिका आगामी काळातील मतदारांसाठी बदलेली ध्येयधोरण आहे की मागील अडीच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहून मिळालेला संगत गुण, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Chief Minister Uddhav Thackeray addressing the gathering
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद सभेत

By

Published : Jun 9, 2022, 5:24 PM IST

औरंगाबाद :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी केलेले वक्तव्य शिवसेना आपल्या भूमिका बदलत आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत आहे. विशेषतः मुस्लिम बांधवांचा द्वेष करण्याची शिकवण नसल्याचे त्यांनी सांगितलं. ही भूमिका आगामी काळातील मतदारांसाठी बदलेली ध्येयधोरण आहे की मागील अडीच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहून मिळालेला संगत गुण, असा प्रश्न उपस्थित होतोय.

पहिल्यांदाच मुस्लिम समाजाबाबत केले वक्तव्य :शिवसेना प्रमुखांनी कधीही मुस्लिम समाजाचा द्वेष करा, अशी शिकवण दिली नाही. कोणत्याही समाजाबाबत द्वेष करू नका, आपला धर्म घरी ठेवून या. रस्त्यावर आल्यावर देश हा धर्म म्हणून फिरा, असं ते सांगत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. रस्त्यात पडलेली कुराण आदराने उचलून ठेवणाऱ्या महाराजांची शिकवण आहे. त्यामुळे आपण द्वेष करू शकत नाही. आपल्या देवांचा अवमान केलेला आपल्याला चालणार नाही, तर इतरांच्या धर्मीयांचा अवमान केलेला कसा चालेल. भाजपच्या तिनपाट प्रवक्त्याने केलेले विधान म्हणजे अवमान करणारे आहे.ते विधान भाजपचे आहे, देशाचे नाही, असे शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत केले. त्यामुळे शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी, अशी असणारी विचारधारेत बदल करीत आहे, असे संकेत दिले जात आहेत का? असा विचार अनेकांच्या मनात आला आहे.

बाळासाहेबांनी आम्हाला चांगली शिकवण दिली :शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात मुस्लिम, मुसलमान अशा शब्दांचा वापर न करता कठोर शब्द वापरत होते. त्यामुळे त्यांच्या भाषणातून नेहमी मुस्लिम समाजाबाबत विरोधी भूमिका स्पष्ट दिसून येत होती. त्यातूनच हिंदुत्ववादी संघटना म्हणून शिवसेना उदयास आली. काही वर्षांपूर्वीपर्यंत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील मुस्लिम समाजाच्या बाजूने सोम्य झाल्याचं दिसून आले नाही. मात्र, शिवसेनेच्या हिंदुत्वावर आणि त्यांच्या भूमिकांवर भाजप आणि मनसे प्रहार करीत असताना. शिवसेना कोणत्याही धर्माचा द्वेष करीत नाही.

शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित : शिवसेना प्रमुखांनी कधीही मुस्लिमांचा द्वेष करा, त्यांना मारा असं म्हटलं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात आगामी काळात मतांची जुळवा-जुळव करण्यासाठी ही भूमिका आहे का? की महाविकास आघाडीत सेक्युलर पक्ष समजले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या संगतीत राहून शिवसेनेला संगत गुण लागला. आणि त्यांनी आल्या ध्येयधोरणात बदल केला हे आगामी कालच सांगेल.

हेही वाचा :Uddhav Thackeray : भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली.. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details