महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुलरचा वापर ठरतोय जीवघेणा; अशी घ्या काळजी..!

राज्यात उन्हाचा पारा 40 डिग्रीच्यावर असल्याने नागरिकांच्या जीवाची लाही होत आहे. गर्मी पासून बचाव करण्यासाठी अनेकजण कुलरचा आधार घेतात. घरात कुलर वापरात असताना राज्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आणि अमरावती येथे या दोन घटना घडल्या. मात्र, कुलर वापरात असताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

By

Published : May 30, 2019, 8:30 PM IST

कुलरचा वापर ठरतोय जीवघेणा; अशी घ्या काळजी..!

औरंगाबाद - उकाड्यापासून बचाव करण्यासाठी लावण्यात येणारा कुलर जीवघेणा ठरत आहे. कुलरच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून जीव गेल्याच्या घटना औरंगाबाद आणि अमरावतीत नुकत्याच घडल्या. त्याच प्रमाणे राज्यातही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या दिसून आले आहे. त्यामुळे कुलर वापरताना काजळी घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्याबाबत औरंगाबादच्या शिवनाथ काळे या तज्ज्ञांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...

कुलरचा वापर ठरतोय जीवघेणा; अशी घ्या काळजी..!

राज्यात उन्हाचा पारा 40 डिग्रीच्यावर असल्याने नागरिकांच्या जीवाची लाही होत आहे. गर्मी पासून बचाव करण्यासाठी अनेकजण कुलरचा आधार घेतात. घरात कुलर वापरात असताना राज्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आणि अमरावती येथे या दोन घटना घडल्या. मात्र, कुलर वापरात असताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

काळेंनी सांगितले की, कुलर घेताना शक्यतो पत्र्याची बॉडी असलेला कुलर घेणं टाळावे, कुलर घेताना शक्यतो नामांकित कंपणीचेच घ्यावेत. लोकल मेड असलेले कुलर सुरक्षित असल्याची हमी नसते, त्यात वापरलेले साहित्य याची शास्वती नसते. अनेकवेळा आतील वायरिंग उघडी असण्याची शक्यता असते. त्यामुळे कुकरमध्ये असलेल्या पाण्यात करंट उतरण्याची भीती असते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. कुलर वापरत असताना शक्यतो तो लहानमुलांसपासून सुरक्षित अंतरावर ठेवावा. कुलरच्या जाळीत लहानमुलांचे हात आत जाऊ शकतात. त्यामुळे काजळी घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details