महाराष्ट्र

maharashtra

आरएसएसशी संबंध सांगणाऱ्या जलील यांनी पुरावे दिले नाहीत - सुजात आंबेडकर

By

Published : Sep 26, 2019, 11:35 AM IST

Updated : Sep 26, 2019, 2:56 PM IST

वंचित आणि एआयएमआयएम पक्षांच्या युती संदर्भात बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या दारावर ज्यांनी कुलूप लावले आहे, त्यांनीच ते कुलूप उघडावे. कारण, जो शेवटी कुलूप लावतो चावी त्याच्याकडेच असते आणि तोच दरवाजा उघडू शकतो, असा टोलाही त्यांनी खासदार जलील यांना लगावला. तसेच वंचित आणि एमआयएम यांच्यात अजूनही आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत आमचे दरवाजे हे उघडे ठेवलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुजात यांच्या उपस्थितीत शहरात युवकांचा संवाद मेळावा घेण्यात आला.

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी पासून वेगळे झाल्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आरएसएसचे काही लोक वंचितमध्ये असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्या आरोपांवर खासदार जलील यांनी कुठलेच पुरावे सादर केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिले. तसेच खासदार जलील हे पत्रकार होते. त्यामुळे त्यांनी पुरावे सोबत ठेवूनच बोलायला हवे, असेही सुजात यांनी म्हटले आहे. सुजात यांच्या उपस्थितीत शहरात युवकांचा संवाद मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आरएसएसशी संबंध सांगणाऱ्या जलील यांनी पुरावे दिले नाहीत - सुजात आंबेडकर

हेही वाचा -ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट

वंचित आणि एआयएमआयएमच्या युती संदर्भात बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या दारावर ज्यांनी कुलूप लावले आहे, त्यांनीच ते कुलूप उघडावे. कारण, जो शेवटी कुलूप लावतो त्याच्याकडेच चावी असते आणि तोच दरवाजा उघडू शकतो, असा टोलाही त्यांनी खासदार जलील यांना लगावला. तसेच वंचित आणि एमआयएम यांच्यात अजूनही आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत आमचे दरवाजे हे उघडे ठेवलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -सत्ताधारी पक्षातील १००-२०० जणांशिवाय काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही - गुलाम नबी आझाद

देशात गौरी लंकेश किंवा दाभोलकर यांच्यासारख्या समाज परिवर्तन घडवणाऱ्या लोकांच्या हत्या झाल्या. या हत्येनंतर कोणी फटाके फोडले, कोणी आनंद व्यक्त केला हे पाहिले तर यामागे कोण आहे हे स्पष्ट कळेल, असे सांगत या हत्यांमागे आरएसएस असल्याची टीकाही सुजात यांनी केली. इतकेच नाही तर राज्यात भाजप सरकार पुन्हा स्थापन झाले तर मुस्लीम आणि दलितांवर होणारे अत्याचार वाढतील असा आरोप सुजात आंबेडकरांनी केला.

हेही वाचा -मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा एवढी आहे संपत्ती

विधानसभा निवडणुकीत राम मंदिर, काश्मिर, पाकिस्तान या मुद्द्यांना आता मतदार कंटाळले आहेत. जनतेला आज विकासाचे मुद्दे हवे आहेत आणि आम्ही याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Sep 26, 2019, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details