महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अजितदादांनी योजना तपासावी, मात्र ती पूर्ण करावी' - अजितदादांनी योजना तपासावी

तांत्रिकबाबी तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉटर ग्रीड योजना थांबवली आहे. मात्र, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी ही योजना सुरू करावीच लागेल, असे मत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले.

Prashant bamb comment on Ajit pawar
भाजप आमदार प्रशांत बंब

By

Published : Jan 31, 2020, 4:24 PM IST

Updated : Jan 31, 2020, 6:39 PM IST


औरंगाबाद - तांत्रिकबाबी तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉटर ग्रीड योजना थांबवली आहे. मात्र, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी ही योजना सुरू करावीच लागेल, असे मत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले. वॉटर ग्रीड योजनेत काही त्रुटी असल्याने या योजनेचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे.

मराठवाड्याच्या विविध प्रश्नांसाठी सर्व लोकप्रतिनिधींची २ फेब्रुवारीला बैठक आयोजित केल्याची माहिती भाजप आमदार प्रशांत बंब यांनी दिली. शेतकरी आत्महत्या आणि शेतीसाठी लागणारे पाणी याबाबत करावे लागणारे उपाय याबाबत मराठवाड्यातील आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मराठवाड्यासाठी असलेल्या योजना थांबवू नये, अशी मागणी एकत्रीतरित्या मुख्यमंत्र्यांकडे करण्याबाबत चर्चा करायची आहे. जेणेकरून विविध मागण्यांचा एकत्रित रेटा लावून धरता येईल, अशी माहिती प्रशांत बंब यांनी दिली.

प्रशांत बंब यांच्याशी बातचीत

हेही वाचा -अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020: राष्ट्रपती अभिभाषण; 'सीएए' ने गांधीजींचे स्वप्न पूर्ण

हेही वाचा - 'मुंबईच्या 'मातोश्री'चा शक्तीपात, तर दिल्लीची मातोश्री शक्तीशाली'

अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी वॉटर ग्रीडची योजना तापसण्याबाबत विचार केला असेल, तर तो योग्य आहे. काही नुकसान नाही हे पाहिलं पाहिजे. मात्र, आम्ही ४ वर्षे अभ्यास करून ही योजना राबवण्याचा प्रयत्नात होतो. आम्हाला विश्वास आहे की, ही योजना त्यांना पटली नाही तर दुसरी कोणती योजना त्यांच्या डोक्यात असेल तर ती योजना ते मराठवाड्यासाठी देतील असेही बंब यावेळी म्हणाले.

Last Updated : Jan 31, 2020, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details