महाराष्ट्र

maharashtra

कांद्याला मिळाला 60 पैसे किलोचा दर, बाजारात मिळतोय 8 ते 10 रुपये किलोने

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसात कांद्याचे दर गडगडले आहेत. 55 ते 60 पैसे किलो इतका दर शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला आहे. कांदा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्वाचा पदार्थ आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याचे पीक घेतो. गेल्या काही वर्षात कांद्याला चांगले दर मिळत असताना कांदा लागवड 20 हजार हेक्टरने वाढली आहे. नवीन कांदा बाजार पेठेत दाखल झाला आणि कांद्याचे दर गडगडले. किमान दर 1 रुपयांपर्यंत असताना अचानक कांद्याला 55 ते 60 पैसे इतका दर शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे होणार खर्च आणि मिळणार उत्पन्न याचा ताळमेळ बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, निर्यात बंदी उठल्याने कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा कांदा व्यापारी विशाल पाडसवान व्यक्त केली आहे.

By

Published : May 24, 2022, 2:26 PM IST

Published : May 24, 2022, 2:26 PM IST

Updated : May 24, 2022, 4:33 PM IST

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद/नाशिक- कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC ) दोन दिवसात कांद्याचे दर गडगडले आहेत. 55 ते 60 पैसे किलो इतका दर शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला आहे. कांदा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्वाचा पदार्थ आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याचे पीक घेतो. गेल्या काही वर्षात कांद्याला चांगले दर मिळत असताना कांदा लागवड 20 हजार हेक्टरने वाढली आहे. नवीन कांदा बाजार पेठेत दाखल झाला आणि कांद्याचे दर गडगडले. किमान दर 1 रुपयांपर्यंत असताना अचानक कांद्याला 55 ते 60 पैसे इतका दर शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे होणार खर्च आणि मिळणार उत्पन्न याचा ताळमेळ बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, निर्यात बंदी उठल्याने कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा कांदा व्यापारी विशाल पाडसवान व्यक्त केली आहे.

सर्वसामान्यांना कांदा महागच -कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने, कांद्याला 75 पैसे ते 5 रुपयांपर्यंत दर मिळत होते. मात्र, अचानक दर घडगडले आणि दर 55 पैसे ते साडेतीन रुपये इतका देण्यात आला. तरी सर्व सामान्यांना बाजारात कांदा 7 ते 10 रुपये किलो या दराने मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच दर कमी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

उत्पादन खर्च ही निघत नाही -राज्यात सर्वत्र कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. त्या तुलनेत कांद्याला मागणी कमी आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. कांदा लागवड साठवणूक व विक्री व्यवस्थापन यामध्ये बळीराजाला अनेकदा अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते. अशात खते आणि इंधनाचे भाव वाढत असल्याने अनेकदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मदतीची गरज -कांदा हे चांगला पैसा मिळवून देणारे पीक असले तरी सध्या मात्र बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या खते, औषधे, मशागत, मजुरी यांचे भाग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, त्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नाही. सद्य परिस्थितीचा विचार करता सरकारने कांदा उत्पादकांना रोख स्वरूपात मदत करणे गरजेचे असल्याचे कृषीतज्ज्ञांनी म्हटले आहे

हेही वाचा -मेव्हण्याने अल्पवयीन मेहुणीला नेले पळवून

Last Updated : May 24, 2022, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details