औरंगाबाद: गंगापूर-वैजापूर मार्गावर मुद्देशवाडगाव पाटीजवळ कांदे घेऊन जाणारा पिकअप व ट्रकच्या अपघात झाला. मध्यरात्री हा अपघात झाला असून यात एक जण ठार तर, एक जण जखमी झाला आहे. अपघात झालेला ट्रक येवला येथून औरंगाबादकडे कांदे घेऊन जात होता.
मुद्देशवाडगाव पाटीजवळ पिकअप व ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक सागर नारायण आहिरे (रा. ठाणगाव ता.येवला, नाशिक) यांचा मृत्यू झाला. ट्रक ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. समाजसेवक अनंता कुमावत यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे पाठवण्यात आले.