महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 10, 2023, 7:17 PM IST

Updated : Jul 10, 2023, 10:38 PM IST

ETV Bharat / state

Road Problem: मंत्र्यांचा फौजफाटा मात्र अंत्यविधीसाठी चिखलातून काढावी लागते वाट‎, प्रशासनाचे दुर्लक्ष‎

जिल्ह्यात दोन केंद्राचे मंत्री, तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असा राजकीय दबदबा असूनही नागरिकांना अंत्यविधीला जाण्यासाठी चिखलातून जावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथील आंबेडकर वस्तीच्या लोकांना जाण्या-येण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News
अंत्ययात्रा चिखलातून नेताना नागरिक

अंत्यविधीसाठी चिखलातून काढावी लागते वाट

छत्रपती संभाजीनगर: देवळाणा बुद्रुक येथील एका व्यक्तीची अंत्ययात्रा चिखलातून नेताना नातेवाइकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. देवळाणा बुद्रुक येथे स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात मृतांवर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील दगडू चाबुकस्वार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी बाहेर गावावरून नातेवाईक आले. परंतु रस्ता चिखलमय, जागोजागी खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने चिखल तुडवीत अंत्ययात्रा न्यावी लागली. यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याबाबतचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.



अनेक वेळा मागणी : खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथील आंबेडकर वस्तीच्या जवळ असलेला दीड किलोमीटरचा रस्ता, अनेक वर्षांपासून तयार झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून आसपासच्या शेतकऱ्यांनी रस्ता होऊ नये यासाठी वाद निर्माण केला, तो वाद चार वर्षांपूर्वी मिटला. त्यानंतर या ठिकाणी रस्ता करावा अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र, त्या मागणीकडे कोणत्याही राजकीय नेत्यांनी लक्ष दिले नाही. तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत मागच्यावर्षी कच्चा रस्ता तयार केला होता. वर्षभरात रहदारी आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे तो पुन्हा खराब झाला. त्या रस्त्यावरून जाणे देखील अवघड झाले आहे. त्यात अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जाणे म्हणजे सर्वात त्रासदायक ठरत आहे. त्याबाबत आपण चांगला रस्ता करण्याची मागणी केला असल्याचे माहिती, सरपंच नईम शहा यांनी दिली.



मुरूम टाकणार : देवळाना बुद्रूक येथील आंबेडकर वस्ती येथे रस्ता नाही. पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना ये-जा करताना नरक यातना सहन कराव्या लागतात. येथे स्मशानभूमीही नसल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सदरील रस्ताबाबत मंजुरी मिळाली असून त्याचे सर्वेक्षण देखील झाले आहे. तेथे डांबर रस्ता तयार होणार असला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार यांना निवेदन दिले आहेत. मात्र अद्याप काम कधी होणार याबाबत कुठलीच माहिती नसल्याचे सरपंच नईम शहा यांनी सांगितले. आंबेडकर वस्तीतील शालेय विद्यार्थी, वृद्ध, महिला, पुरुषांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष न दिल्याने लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना न केल्यास आगामी निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा -

  1. Road Dug In Diva: मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला रस्ता पुन्हा एकदा खोदला; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास
  2. Jalna News : मॅडम, मला शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या, शेतकऱ्याच्या मागणीमुळे तहसिलदार चक्रावले
Last Updated : Jul 10, 2023, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details