औरंगाबाद : पाकव्याप्त कश्मीर (Pakistan Occupied Kashmir issue) भारतात आणण्याच्या हालचालीला वेग येत असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून केल्या जात आहेत. भारतीय लष्कर त्यासाठी सक्षम असलं, तरी त्याला राजकीय नेत्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. युद्ध हे सर्वात शेवटचे हत्यार आहे. त्याआधी वेगवेगळ्या बाजूने दबाव टाकला जातो, असं मत लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे (Lt Col Dr Satish Dhage) यांनी व्यक्त (expressed his opinion) केलं.
भारतीय जवान सक्षम :पाक व्याप्त कश्मीर देशाचा अविभाज्य घटक आहे. लष्कर अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी त्याबाबत वक्तव्य केले आहे. एक प्रस्ताव देखील सरकारने पारित केला होता. जनरल द्विवेदी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यावर उत्तर देताना माहिती दिली की, आजही कश्मीरमध्ये 160 अतिरेकी लपून बसलेले आहेत. पाकिस्तान सोबत युद्धबंदी कायदा लागू आहे. मात्र हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर मिळेल. देश हा सक्षम आहे, मात्र युद्ध हा शेवटचा पर्याय आहे. त्याआधी राजकीय आणि जागतिक पातळीवर दबाव टाकण्याचे काम केलं जातं. पाकिस्तानमध्ये लष्कर आणि राजकीय मंडळींवर तिथली जनता नाराज आहे. त्यात बलुचिस्तानला आपण सोबत घेत जर नीती आखली, तर पाकिस्तानवर दबाव टाकणं आणखी सोपे होईल. तरीदेखील पाक व्याप्त कश्मीर मिळवणे आव्हानात्मक असेल, असं मत लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.