महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nath Shashti : नाथ षष्ठी साठी सज्ज झाले नाथ मंदिर, काल्यातून मिळणार भक्तांना प्रसाद

छत्रपती संभाजीनगर शहरात शेकडो वर्षांपासून नाथषष्ठीची परंपरा सुरू आहे. ऐतिहासिक काळापासून हा परिसर प्रति पैठण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दहीहंडीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण आहे.

By

Published : Mar 15, 2023, 7:21 PM IST

Updated : Mar 16, 2023, 8:28 AM IST

Nath Shashti
नाथ षष्ठी साठी सज्ज झाले नाथ मंदिर

नाथ षष्ठी साठी सज्ज झाले नाथ मंदिर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : संतांची नगरी अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात नाथ षष्ठीची परंपरा शेकडो वर्षांपासून आजही कायम आहे. पैठण येथे एकनाथ षष्ठीला दहीहंडी फोडून प्रसाद स्वरूपात काला वाटण्याचे प्रथा आहे. तसीच प्रथा शहरातील औरंगपुरा भागातील नाथ मंदिरात पार पडली जाते. प्रती पैठण म्हणून या भागाची ओळख इतिहास काळापासून आहे, त्यामुळे दहीहंडीनिमित्त मंदिर परिसर भक्तीमय झाल्याचे पाहायला मिळतय.

नाथ महाराजांचे वास्तव असल्याने आहे वेगळे महत्त्व :संत एकनाथ महाराज यांचे पैठण येथे मोठे मंदिर आहे. दरवर्षी लाखो वारकरी - भाविक नाथ महाराजांच्या दर्शनासाठी नित्य नियमाने येत असतात. त्यांच्या पादुका त्या भागात नाथ मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या दोन पादुका असून त्यातील एक पादुका औरंगपुरा भागातील नाथ मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराला प्रती पंढरपूर असह म्हणलं जात. असं म्हणतात की एकनाथ महाराज पैठणून सुलीभंजन येथे दत्ताचे दर्शन घेण्यासाठी जात असताना ते औरंगपुरा येथील नाथ मंदिरात वास्तव्यास असायचे. रात्री भजन, कीर्तन देवाचे नामस्मरण करून ते सकाळी मार्गस्थ व्हायचे. परत येताना पुन्हा ते नाच मंदिर परिसरात वास्तव्यास असायचे. त्यामुळे त्या भागात संत एकनाथ महाराजांचे चरण स्पर्श झाल्या असल्याने प्राचीन काळापासून वाडा आहे. त्या ठिकाणी दरवर्षी नाथ षष्ठीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो अनेक भाविकांना पैठण येथे जाणं शक्य होत नाही, त्यामुळे औरंगपुरा येथे असलेल्या मंदिरात भाविकांसाठी सोहळा ठेवला जातो आणि त्याला हजारो भावीक दर्शनासाठी येतात अशी माहिती मंदिर विश्वस्त लक्ष्मण थोरात यांनी दिली.

दहा दिवस चालतो सोहळा :प्रति पैठण अशी ओळख असलेल्या औरंगपुरा येथील नाथ मंदिरात होळी झाल्यानंतर नाथ षष्ठीच्या तयारीला सुरुवात केली जाते. दहा दिवस भक्ती भावाने हा सोहळा साजरा केला जातो. या काळात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. त्यामध्ये नाथा गायन, गाथा गायन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भजन कीर्तन केले जाते. इतकंच नाही तर तुकाराम बीज सोहळा देखील या मंदिरात केला जातो. भक्ती भावाने दिंडी काढली जाते. मंदिर परिसरात निघालेल्या दिंडीला हजारो भाविक सोहळ्यात सहभागी होतात. पैठणला असते त्या प्रकारचे स्वरूप कार्यक्रमाला प्राप्त होते.

देशमुख कुटुंबीयांना मिळतो कल्याचा मान :गेल्या साठ वर्षांपासून नाथ मंदिरात करण्यात येणाऱ्या दही हंडी सोहळ्याचा काला म्हणजेच लाह्यांचा प्रसाड तयार करण्याचा मान देशमुख कुटुंबीयांना मिळतो. गीताबाई देशमुख यांना सन्मान देण्यात आला. आता त्यांच्या नंतर त्यांच्या दोन सूना काही वर्षांपासून काला तयार करत आहेत. जवळपास तीन क्विंटल चा प्रसाद तयार केला जातो. त्यासाठी महिनाभर आधी तयारी केली जाते. तर आमची पुण्याई असल्यानेच आम्हाला काला तयार करण्याची जबाबदारी मिळते अस मत देशमुख कुटुंबीय कविता संजय देशमुख यांनी सांगितलं. तर सोहळ्यात नव्या पिढीच्या कल्पना घेत नवनवे उपक्रम राबवत असल्याचे विश्वस्त नम्रता दवे यांनी सांगितलं.

हेही वाचा - Nana Patole On Old Pension Scheme : २० लाख कर्मचारी संपावर गेल्याने जनता बेहाल

Last Updated : Mar 16, 2023, 8:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details