महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Imtiaz Jaleel on Aurangabad rename : मला छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही, आंदोलन करणार; इम्तियाज जलील यांची घोषणा - छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही

औरंगाबादच्या नामांतराला इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. 27 मार्चच्या आधी छत्रपती संभाजी नगर नावाचा विरोध करायला मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतला, अशी खरमरीत टिका जलील यांनी केली आहे.

Imtiaz Jaleel
खा. इम्तियाज जलील

By

Published : Mar 1, 2023, 1:26 PM IST

खा. इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर :मी आजही औरंगाबादच्या नामांतराचा विरोध करत आहे. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे नाव औरंगाबादला देत आहात, तर माझे काही प्रश्न आहेत. औरंगाबाद आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा काय संबध होता ते सांगा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून किंवा मी खासदार म्हणून नाही तर सामान्य माणूस म्हणून नाव बदलाला विरोध करत आहात त्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवत आहेत, चर्चा करून त्याबाबत जाहीर माहिती देऊ अशी घोषणा एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

इतर शहरांची नाव बदला : इतर शहरांची नावे बदला : शौर्यावरून जर तुम्ही नाव बदलत असाल तर कोल्हापूरचे नाव बदलून ते छत्रपती शाहू नगर ठेवा. पुण्याचे नाव बदलून फुलेनगर करा. नसेल तर पुणेच्या जागी फुले करा. नागपूर शहराचे नाव बदलून ते डॉ बाबासाहेब नगरी ठेवा. मुंबईचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजनगर करा. मालेगावचे नाव मौलाना आबाद करा अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. बाळासाहेब ठाकरे येथे आले आणि राजकारणाचे दुकान चालवणे सुरू केले. होती. महाराष्ट्रात औरंगाबाद तुम्हाला जमत नाही. परंतु बिहार येथील औरंगाबाद कस चालेल, त्या बिहार औरंगाबादचा खासदार हा भाजपचा, मग ते नाव का बदलत नाहीत. असे संतप्त प्रश्न इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थितीत केले.

हे नामांतर मानणारनाही: या निर्णयामुळे समाजात फूट पडण्याचा प्रयत्न होत आहे. जी 20 साठी हे परदेशी पाहूने 2 दिवस आले होते. आलेल्या या 150 विदेशी महिला तुम्हाला महत्वाच्या आहेत. देशातील गावातील महिलांकडे पहा. आमचा छत्रपती संभाजी महाराजांना विरोधात नाही, पण जातीवादी मुद्दा नका बदलू. कमीत कमी 1000 ते 1200 कोटी रुपये औरंगाबाद शहराचे पूर्ण नाव बदलायला लागतील असे त्यांनी म्हटले आहे. 27 मार्चच्या आधी छत्रपती संभाजी नगर नावाचा विरोध करायला मोर्चा काढणार असे त्यांनी सांगितले. जे माझे मत होते तेच मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. मुस्लिमांना मी काय अडचणी आहेत हे पिटीशनमध्ये सांगितले होते. मी मराठा समाजाला आणि आरक्षणाला विरोध केला नाही. माझा मराठा आरक्षणाला कुठलाही विरोध नव्हता. व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव काढून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देता मात्र त्याचा या जागेशी काही संबंध नाही. तुम्ही राजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतला अशी खरमरीत टिका केली आहे.

हेही वाचा :Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला शिवसेनेचा होता विरोध - शिंदे गटाचा युक्तीवाद

ABOUT THE AUTHOR

...view details