महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा प्रभाव: संचारबंदीच्या काळात औरंगाबादेत मोफत भोजन - औरंगाबाद कोरोना अपडेट

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात हातावर पोट असलेल्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानका समोर ही प्राथमिक व्यवस्था करण्यात आली आहे.

Free Food
मोफत भोजन

By

Published : Mar 24, 2020, 4:33 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने मोफत शिवभोजन दिले जात आहे. संचारबंदी संपेपर्यंत भोजन मोफतच देण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

संचारबंदीच्या काळात औरंगाबादेत मोफत भोजन

संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणारे लोक उपाशी राहू नये यासाठी ही उपाय योजना केली आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानका समोर ही प्राथमिक व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास इतर ठिकाणीही मोफत शिवभोजन देण्यात येईल, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -'काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकणार'

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील तीन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आली आहे. या काळात हातावर पोट असलेल्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details