महाराष्ट्र

maharashtra

DCM Ajit pawar on Samruddhi Expressway : लांबच लांब सरळसोट रस्ताच समृद्धी महामार्गावर अपघाताचं कारण, अजित पवार बोलले तरी काय?

By PTI

Published : Sep 16, 2023, 8:26 PM IST

Updated : Sep 16, 2023, 9:25 PM IST

DCM Ajit pawar on Samruddhi Expressway : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच समृद्धी महामार्गावरुन नाराजी व्यक्त केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा लांबच लांब महामार्ग फारच सरळ असल्याने चालकाला वाहन चालवताना झोप लागते. यामुळं या महामार्गावर अपघात होतात, असं वक्तव्य अजित पवानांनी केलंय.

DCM Ajit pawar on Samruddhi Expressway
DCM Ajit pawar on Samruddhi Expressway

अजित पवार, उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) DCM Ajit pawar on Samruddhi Expressway :वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेत आलाय. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची अनेक कारणं सांगितली जात आहोत. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे नाराजी व्यक्त केलीय. समृद्धी महामार्ग अत्यंत सरळ झालाय. यामुळं या महामार्गावर चालकाला फक्त सरळच बघावं लागतं. त्यामुळं त्यांचे कधी-कधी डोळे मिटतात आणि अपघात होतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समृद्धी महामार्गाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी ही नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

का होतात अपघात :मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं (Cabinet in Chhatrapati Sambhajinagar) आयोजन करण्यात आलं होतं. तत्पुर्वी शहरातील वंदे मातरम सभागृहात विविध कार्यक्रमांचे उद्घाटन तसेच विकासकामांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणातून विकासकामांवरुनही आपले मत व्यक्त करत, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचे कानही टोचले. राज्य शासनाने केलेल्या विकासकामांविषयी बोलताना अजित पवार समृद्धी महामार्गावर म्हणाले की, सरकारनं समृद्धी महामार्ग वेगात पूर्ण केला. पण, हा महामार्ग अत्यंत सरळ झालाय. लांबच लांब कोणत्याही व्यत्ययाशिवाय गाडी चालवताना एकप्रकारे गुंगी येण्याची शक्यता असते. या महामार्गावर चालकाला फक्त सरळच बघावं लागतं. आजुबाजूला बघायची गरज भासतच नाही, त्यामुळं चालकाचे डोळे कधी कधी मिटतात. यामुळं या महामार्गावर अपघात होतात. आता या महामार्गावर वळणे हवी होती का? अशी चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवारांनी हे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर केलंय, यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

वक्तव्यामुळे कुणीही गैरसमज करु नका :या महामार्गावर चालकाला सरळच बघावं लागतं असल्यानं झोप येते, या माझ्या वक्तव्यावरून माझ्यावर पुन्हा टीका होण्याची शक्यता आहे. पण, मी तसं काहीही बोलत नसून, मला काही तज्ज्ञांनीच असं सांगितल्याचं पवार म्हणाले. त्यामुळं आता आपल्याला काय सुधारणा करता येतील, याचा अभ्यास करुन त्यानुसार दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचंही पवार म्हणाले. समृद्धी महामार्गाविषयी आपण केलेल्या वक्तव्यामुळे कुणीही गैरसमज करुन घेऊ नका असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

  1. Samruddhi Mahamarg Accidents: समृद्धी महामार्ग विकासाचा नव्हे, मृत्यूचा महामार्ग; तब्बल 39 जणांचा मृत्यू, 143 जण जखमी
  2. Raj Thackeray criticizes Gadkari: केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी अपयशी हे महाराष्ट्राचे दुर्दैव-राज ठाकरे
  3. Accident on Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर अपघात मालिका सुरूच; कार अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी आणि मुलगी जखमी
Last Updated : Sep 16, 2023, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details