महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2019, 12:03 PM IST

ETV Bharat / state

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी युती-आघाडीचे अर्ज दाखल; औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुक

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी अर्ज भरला आहे. गुरुवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला.

औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुक

औरंगाबाद- औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी अर्ज भरला आहे. गुरुवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. गेल्या 20 वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर असलेले अंबादास दानवे यांनीदेखील शिवसेनेकडून अर्ज भरला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी युती-आघाडीचे अर्ज दाखल

युतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावली. तर काँग्रेसतर्फे अर्ज करताना बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे स्थानिक नेत्यांनाच घेऊन बाबुराव कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला. युतीतर्फे अंबादास दानवे यांचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. क्रांतीचौक भागातून अंबादास दानवे यांनी वाहनातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी शहागंज येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पक्षीय आकडेमोड पाहता आघाडीने निवडणुकीत रस घेतला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी युती आणि आघाडीच्या उमेदवारांना आपलाच विजय सहज आणि सोपा वाटत आहे.

दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेलेले अंबादास दानवे आणि बाबुराव कुलकर्णी हे प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले. अंबादास दानवे यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या आशीर्वाद घेतला. शिवाय एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details