महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुत्रा चावल्याच्या घटनांमध्ये वाढ; महानगरपालिकेकडे रेबीज लसीचा पुरेसा साठा उपलब्ध

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीज लस घेणे अनिवार्य आहे. नाहीतर आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

By

Published : Apr 4, 2021, 12:33 PM IST

Aurangabad Rabies vaccine stock news
औरंगाबाद रेबीज लस साठा बातमी

औरंगाबाद - शहरामध्ये कुत्र्यांनी चावा घेतलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा नागरिकांना औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाच केंद्रांवर रेबीजची लस दिली जाते. सध्या महानगरपालिकेकडे रेबीज लसीचे ९ हजार डोस उपलब्ध असल्याची माहिती महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.

महानगरपालिकेकडे रेबीज लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले

दोन वर्षात ४ हजार ९७जणांचे तोडले लचके -

औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कुत्रा चावल्याचे घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. शहरामध्ये दिवसाला दहा ते पंधरा जणांना कुत्रा चावल्याच्या घटना समोर येत आहेत. दोन वर्षात तब्बल ४ हजार ९७ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

महानगरपालिकेकडे रेबीज लसीचे ९ हजार डोस -

कुत्रा चावला की त्या व्यक्तीला रेबीज लस दिली जाते. ही रेबीज लस महानगरपालिकेच्या चार आरोग्य केंद्रांवर आणि घाटी रूग्णालयात उपलब्ध आहे. सध्या महानगरपालिकेकडे रेबीज लसीचे ९ हजार डोस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोड यांनी दिली.

2020 या वर्षातील कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी -

  • जानेवारी - 430
  • फेब्रुवारी - 418
  • मार्च - 380
  • एप्रिल - 0 लॉकडाऊनमुळे रूग्ण नाही
  • मे - 0 लॉकडाऊनमुळे रूग्ण नाही
  • जून- 0 लॉकडाऊनमुळे रूग्ण नाही
  • जुलै - 158
  • ऑगस्ट - 220
  • सप्टेंबर - 360
  • ऑक्टोबर - 365
  • नोव्हेंबर - 380
  • डिसेंबर - 410

    एकूण ३ हजार १२१ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला.

    2021 या वर्षातील आकडेवारी(१५ मार्चपर्यंत)
  • जानेवारी - 392
  • फेब्रुवारी - 408
  • मार्च - १५ तारखेपर्यंत 176

    २०२१ मार्च महिन्याच्या १५ तारखेपर्यंत एकूण ९७६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details