महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chirodi Forest : जंगल झाले जलसमृद्ध, चिरोडीच्या जंगलात पाणीच पाणी - Crowd Of Tourists In Chirodi Forest

यावर्षी जिल्ह्यात सर्व दूर भरमसाठ पाऊस कोसळला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत Heavy Rain In Amravati आहे. या पावसामुळे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच अमरावती शहरालगत असणाऱ्या वडाळी, पोहरा आणि चिरोडीचे जंगल जलसमृद्ध झाले Wadali Pohra and Chirodi forest water level increase आहे.

Chirodi Forest
चिरोडीच्या जंगलात पाणीच पाणी

By

Published : Sep 15, 2022, 11:24 AM IST

अमरावती -यावर्षी जिल्ह्यात सर्व दूर भरमसाठ पाऊस कोसळला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत Heavy Rain In Amravati आहे. या पावसामुळे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच अमरावती शहरालगत असणाऱ्या वडाळी, पोहरा आणि चिरोडीचे जंगल जलसमृद्ध झाले Wadali Pohra and Chirodi forest water level increase आहे.

चिरोडी जंगल

पहाडावरून कोसळत आहेत धबधबे -अमरावती चांदुर रेल्वे मार्गावर असणारे वडाळी, पोहरा आणि चिरोडीचे जंगल हे मोठ्या टेकड्या आणि पहाडांनी वेढले आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पहाडावरील पाणी जंगलात असणाऱ्या नदी आणि तलावांमध्ये वाहून आले Ponds Are Overflow आहे. जंगलात असणाऱ्या पहाडावरून कोसळणारे धबधबे यावर्षी पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. उंच भागावर असणारे तलाव ओव्हर फ्लो झाल्यावर या तलावाचे पाणी अनेक ठिकाणी पहाडावरून खाली कोसळत असल्याने हे सुंदर मनोहरी दृश्य पाहण्यासाठी अमरावती सह चांदुर रेल्वे शहरातील निसर्गप्रेमी पर्यटकांची गर्दी जंगलात Crowd Of Tourists In Chirodi Forest व्हायला लागली आहे.


जंगलातील तलाव भरले तुडुंब -अमरावती चांदुर रेल्वे मार्गावर असणाऱ्या जंगल परिसरातील आतील भागात असणारे वडाळी तलाव, छत्री तलाव, भवानी तलाव ,फुटका तलाव, इंदला तलाव ,घाटखेडा तलाव, राजुरा तलाव , गोविंदपुर तलाव ,वरुडा तलाव, पोहरा तलाव, मालखेड तलाव, बासलापूर तलाव ,तरोडा तलाव, भिवापूर तलाव, मार्डी तलाव, शेवती तलाव या सर्व तलावांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाल्याने या तलावातील पाणी वाहून जात आहे. तलावा लगतचा परिसर हिरवागार झाला असून उन्हाळ्यात देखील तलावाची पातळी आता खालावणार नसल्याने वन्य प्राण्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न राहणार नसून हे तुडुंब भरलेले तलाव अमरावती आणि चांदुर रेल्वे शहरातील पर्यटकांना खुणावत आहेत.


वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला -वडाळी पोहरा आणि चिरोडी या जंगलात शंभरच्या जवळ बिबट आहेत. यासह नीलगाय हरिण,काळवीट, ससे असे अनेक वन्य प्राणी आणि विविध प्रजातींचे पक्षी आहेत. दरवर्षी पाच ते सहा महिने जंगलात पाणी राहते आणि त्यानंतर जंगलातील सर्व जलसाठे आटतात. यावर्षी मात्र या जंगलातील सर्वच तलावातील जलसाठा हा शंभर टक्क्यांच्या वर भरला असून उन्हाळ्यात देखील या तलावातील जलसाठा आटणार नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांच्या पिण्याचा प्रश्न यावर्षी भेडसावणार नाही अशीच परिस्थिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details