अमरावती - आधी दुबार पेरणीचे संकट आले. त्यात आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन खोडकिडीने तसेच नंतर आलेल्या परतीच्या पावसाने खराब झाले. यामुळे काढायलाही न परवडणाऱ्या सोयाबीनवर हताश झालेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरच फिरवला. राजू सांभारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
तिवसा तालुक्यातील मालधुर येथील राजू सांभारे या शेतकऱ्याकडे एकूण दहा एकर शेती आहे. त्यातील पाच एकर शेतीवर त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, बोगस बियाण्यांमुळे ते उगवले नाही. त्यानंतर त्यांनी दुबार पेरणी केली. पीक जोमात होते. मात्र, ऐन काढणीच्या वेळेला खोडकीड आणि परतीचा पाऊस आल्याने हातातोंडाशी आलेले पीक खराब झाले.
हेही वाचा -मुलाचे तोंड पाहण्याआधीच आलं वीरमरण, जवान सूरज लामजे अपघातात हुतात्मा