महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 23, 2023, 8:47 PM IST

ETV Bharat / state

Sharad Pawar : समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणावर शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले, शेतकऱ्यांचे...

समृद्धी महामार्गासाठी सुपीक जमीन गमावणे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथे व्यक्त केले आहे. ते रविवारी अमरावती शहरात आयोजित कृषी पदवीधर संघटनेच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाला संबोधित करीत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar

राज्यस्तरीय अधिवेशनाला संबोधित करतांना शरद पवार

अमरावती :मी आज विमानाने येत असताना मला नाशिक पासून नागपूर पर्यंत समृद्धी महामार्ग दिसला. या समृद्धी महामार्गाने राज्याच्या औद्योगिक विकासाला निश्चितच गती येईल यात कुठलीही शंका नाही. मात्र, या समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन गेली हे वास्तव आहे. आज अमरावती एमआयडीसीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. या उद्योगांसाठी देखील जी काही जमीन गेली ती शेतकऱ्यांचीच होती. आज पंजाब, हरियाणामध्ये शेतीची मुबलक जमीन टिकून आहे. पाण्याचा साठा देखील भरमसाठ आहे, पाण्याची कमी असून होती नव्हती ती सुपीक जमीन हातची गेली. हेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज अमरावती शहरात आयोजित कृषी पदवीधर संघटनेच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाला संबोधित करीत होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे उडाली झोप : मी देशाचा कृषिमंत्री असताना विदर्भात वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना माझी अक्षरशः झोप उडून गेली होती. मी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना माझ्यासोबत विदर्भात चालण्याची विनंती केली. पंतप्रधानांनी माझ्यासोबत विदर्भाचा दौरा केला. यवतमाळ जिल्ह्यात ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुलीचे लग्न ठरले असताना शेतीसाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नसल्यामुळे आणि सावकार पैशासाठी तगादा लावत असल्यामुळे त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे कळताच आम्हाला धक्का बसला. आम्ही त्यावेळी तात्काळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आखली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली.

कृषिमंत्री झालो :भारताचा कृषिमंत्री म्हणून मी शपथ शपथ घेतली आणि माझ्या निवासस्थानी पोहोचलो असताना कृषी विभागाच्या सचिवाने माझ्यासमोर एक फाईल ठेवली. देशात केवळ वर्षभर पुरेल इतकाच धान्यसाठा उपलब्ध असल्याचे सचिवांनी सांगितले. यामुळे परदेशातून धान्य आयात करावी लागेल. यासाठी या फाईलवर स्वाक्षरी करावी असे तो मला म्हणाला. मात्र, मी त्या फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मला देशात लोकांना खायला धान्य नाही, ही गंभीर परिस्थिती असल्याची माहिती दिली. दुर्दैवाने मला परदेशातून धान्य आयात करण्यासाठीच्या फाईलवर स्वाक्षरी करावी लागली. धान्य आयात करण्यासंदर्भात मी केलेली स्वाक्षरी मला सतत पोचत होती. मात्र 2014 मध्ये मी मंत्रीपद सोडले त्यावेळी भारत जगात तांदुळाच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर, गव्हाच्या निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर होता. याचा मला प्रचंड अभिमान वाटत असल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

महात्मा फुलेंकडे कृषी विकासाची दूरदृष्टी :व्हाईसरॉय जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी मुंबईत समुद्रकिनारी गेटवे ऑफ इंडिया उभारण्यात आले. या गेटवे ऑफ इंडियाचे जॉर्ज पंचम याने उद्घाटन केले. त्यावेळी डोक्याला पगडी बांधलेला गृहस्थ त्यांच्याकडे आला आणि त्यांनी जॉब पंचम यांच्याकडे निवेदन सादर केले. या निवेदनात भारतात कधी अतिवृष्टी होते, कधी गारपीट होते, यामुळे शेती अनिश्चित आहे. यासाठी आम्हाला परदेशातून चांगले बियाणे द्यावेत. ज्यामुळे आम्हाला उत्कृष्ट शेती करता येईल, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच भारतात ज्यांना खडी फोडण्याची शिक्षा होते, त्यांना खडी फोडायला लावण्यापेक्षा पावसाचे पाणी जमिनीत पुरवण्याचे काम देण्यात यावे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाला महत्त्व यावे, यासाठी प्रदेशातून वळू आणून या ठिकाणी गाईच्या, नव्या प्रजाती निर्माण कराव्यात अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या पाहून जॉर्ज पंचम यांना देखील आश्चर्य वाटले होते. देशाच्या कृषी क्षेत्राबाबत हित जोपासणाऱ्या मागण्यांची निवेदन सादर करणारी व्यक्ती ही महात्मा फुले ही होती. महात्मा फुलेंकडे कृषी विकासाबाबत दूरदृष्टी होती. आज त्यांच्याच नावाने कृषी पदवीधरांची संघटना स्थापन करण्यात आली, असल्याचा अभिमान मला वाटतो, असे शरद पवार म्हणाले. आता पदवीधरांच्या संघटनेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखीच दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्रात शेतीचा विकास निश्चितपणे साधल्या जाईल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिवेशनाला यांची होती उपस्थिती :कृषी पदवीधर संघटनेच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणाऱ्या शरद पवार यांच्यासोबत माझी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल, महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख, कृषी पदवीधर संघटनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रभाकर देशमुख, केंद्रातील माजी कृषी सचिव चारुदत्त माई, माजी मंत्री वसुधा देशमुख, अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी धीरज लिंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते. सुधीर राऊत यांच्या प्रयत्नाने आयोजित या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विकासासाठी दहा महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले. राज्याच्या कृषी क्षेत्रात प्रगती करणारे हे सर्व दहाही ठराव राज्य शासनाकडे आपण मांडणार असे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा -Sex Racket Busted : मुलींचे कौमार्य तोडण्यासाठी लाखांचा सौदा; सेक्स रॅकेट चालवणाऱया दोघींना अटक

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details