महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 13, 2020, 6:08 PM IST

Updated : Nov 13, 2020, 6:50 PM IST

ETV Bharat / state

दिवाळीपर्व : राज्यातील 'हा' आमदार यंदाही वृद्धांच्या सेवेसाठी वृद्धाश्रमात

सातत्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून चर्चेत असणारे राज्यमंत्री बच्चू कडू नेहमी सामाजिक कार्यक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक वर्षांपासून ते वृद्धाश्रमात जाऊन आपल्या दिवाळीची सुरुवात करतात.

minister bacchu kadu
बच्चू कडू

अमरावती - दिवाळी सणाची सुरवात प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने सुरू करत असतात. यानुसार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दिवाळीची सुरुवात ही दरवर्षी वृद्धाश्रमातील वृद्धांना आंघोळ घालून त्यांना नवे वस्त्र दान करून सुरू होत असते. यंदाही आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मधुबन वृद्धाश्रमात वृद्धांना उटणे लावून अंघोळ घातली. त्यानंतर त्यांना नवे कपडे आणि पुरणपोळीचे जेवणही स्वतः वाढून बच्चू कडूंनी या दिवाळीला सुरवात केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया देताना.

सातत्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून चर्चेत असणारे राज्यमंत्री बच्चू कडू नेहमी सामाजिक कार्यक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक वर्षांपासून ते वृद्धाश्रमात जाऊन आपल्या दिवाळीची सुरुवात करतात.

मागील वर्षीही दिवाळी आश्रमात -

मागील वर्षी दिवाळीच्या काही दिवस पूर्वीस राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. त्यामुळे विजयी झालेले सर्व नेते विजयाच्या आनंद साजरा करत होते. मात्र, बच्चू कडू हे एका अनाथ आश्रमात जाऊन त्यांनी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यावेळीही त्यांनी अनाथ मुलांना नवे कपडे, गोडधोड जेवण दिले होते.

हेही वाचा -आयुष्याच्या 'संध्याकाळी' वृद्धाश्रमात दिवाळी साजरी

वृद्धाना मायेने विचारपूस -

बच्चू कडू यांनी वृद्धांना अंघोळ घालून दिली. बच्चू कडूंच्या या सेवेमुळे वृद्धही यावेळी गहिवरुन गेले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी आपण किती कष्ट केले? मात्र, तरी आज कुठला दिवस पाहायला मिळत आहे? अशी कैफियत या वृद्धांनी बच्चू कडूंसमोर मांडली.

तरुणांनी वृद्धाश्रमात जावे -

ज्याप्रमाणे तरुणाई राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेतात. त्याचप्रमाणे सेवेचा झेंडा हाती घ्याव्या. जेणेकरून आपला तिरंगा आणखी मजबूत होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. तसेच जसे आपण मंदिर, मस्जिद, बौद्ध विहारमध्ये जातो, तसेच आपण वृद्धाश्रमातही गेले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज्यातील राजकीय नेते हे सध्या आपल्या कुटुंबासोबत दिवाळी करण्यात व्यग्र असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धाश्रमात जाऊन दिवाळी साजरी केल्यामुळे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

Last Updated : Nov 13, 2020, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details