महाराष्ट्र

maharashtra

लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर बाजारपेठेत पुन्हा वर्दळ, अमरावतीकरांनो नियम पाळा!

By

Published : Jun 2, 2021, 4:09 PM IST

Updated : Jun 2, 2021, 4:35 PM IST

अमरावतीतील लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. तर नागरिकांचीही पुन्हा गर्दी दिसून येत आहे.

amravati
अमरावती

अमरावती - आता अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 15 फेब्रुवारीपासून अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता.

लॉकडाऊन शिथिल होताच अमरावतीत पुन्हा गर्दी

पुन्हा नागरिकांची तूफान गर्दी

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. त्यामुळे कालपासून (1 जून) बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. काल पहिला दिवस असल्याने बाजारपेठेमध्ये पुन्हा मोठ्या संख्येने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. आज (2 जून) सलग दुसऱ्याही दिवशी अमरावतीच्या जयस्तंभ चौक, ईतवारा, सराफा बाजार, जवाहर गेट या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

चौकाचौकात बॅरिकेट्स

अमरावती शहरात गर्दी नियंत्रित राहण्यासाठी पोलिसांनी इतवारा, जवाहर गेट आदी ठिकाणी बॅरिकेट्स लावले आहेत. शहरामध्ये जड वाहनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. दुकानदारांना सोशल डिस्टन्स, मास्कच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा -खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल

Last Updated : Jun 2, 2021, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details