महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 10, 2020, 2:01 PM IST

ETV Bharat / state

अमरावतीत तळीरामांनी भागवली दारूची तहान; दोनच दिवसात १ कोटी ४० लाख किमतीची दारू विक्री

जवळपास १०० दुकाने सुरू झाल्याने तळीरामांची झुंबड उडाली होती. दरम्यान, लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने तब्बल दीड महिन्यानंतर जरी उघडली असली, तरी दारू विक्रीत फार वाढ झाली नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले.

liquor sale amravati
अमरावतीत तळीरामांनी भागवली दारूची तहान

अमरावती- लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात दारूची दुकाने बंद आहेत. मात्र, राज्य शासनाने दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारूची दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर, कित्येक दिवसापासून दारूचा घोट न घेतलेल्या तळीरामांनी आपली दारूजी तहान भागवली. केवळ दोन दिवसातच तळीरामांनी १ कोटी ४० लाख रुपयांची देशी, विदेशी दारू खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावतीत तळीरामांनी भागवली दारूची तहान

दोन दिवसात जिल्ह्यातील दारूच्या दुकानांमधून तब्बल ९७ हजार ६०० लिटर दारूची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७२ हजार लिटर देशी दारू विकली गेली आहे. देशीदारूबरोबरच ११ हजार ६०० लिटर बीअर व १४ हजार लिटर विदेशी दारू देखील विकली गेली आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने देशभरातील दारूची दुकाने, बार हे बंद होते. परंतु, केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारू विक्रीला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वरूड व शिरळा वगळता बाकी सर्व ठिकाणची देशी दारू, बार व वाईन शॉप दुकाने सुरू करण्यात आली.

जवळपास १०० दुकाने सुरू झाल्याने तळीरामांची झुंबड उडाली होती. दरम्यान, लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने तब्बल दीड महिन्यानंतर जरी उघडली असली, तरी दारू विक्रीत फार वाढ झाली नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले.

हेही वाचा-अमरावती रेल्वे स्थानकावरून मजुरांना घेऊन विशेष रेल्वेगाडी लखनऊला रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details