अमरावती - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कळकळात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने मेळघाटातील टेब्रूसोडा येथील नानाजी दहिकर (वय ७०) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. नानाजी शेतात गुरे चरण्यासाठी गेलेले होते.
अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कळकळात पाऊस पडला. नानाजी याच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी नानाजी यांचा मृतदेह अचलपूर येथे शवविच्छेदन करण्यास पाठविले. या संदर्भात अधिक तपास पोलीस करताहेत.