महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती: शेतकऱ्यांना दिलासादायक! हिरव्या मिरचीला बाजारात प्रति किलो ६५ रुपये भाव - अमरावती कृषी न्यूज

प्रवीण खैरकार या शेतकऱ्याने वेळेवर मिरची रोपांची लागवड, फवारणी व उत्तम नियोजना केल्याने मिरचीचे पीक चांगले आले आहे. त्यातच समाधानकारक भाव मिळाल्याने त्यांना दोन एकरात २० लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

मिरचीची लागवड दाखविताना शेतकरी
मिरचीची लागवड दाखविताना शेतकरी

By

Published : Oct 9, 2020, 3:42 PM IST

Updated : Oct 9, 2020, 3:54 PM IST

अमरावती - विदर्भात पुन्हा एकदा परतीचा पाऊस आला आहे. पावसामुळे सोयाबीन, कापूस पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील हिरव्या मिरचीची पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बाजारात मिरचीला ६५ रुपये प्रति किलो भाव मिळत आहे.

मिरचीला प्रति किलो ६५ रुपये भाव मिळत असताना खर्च वजा जाता शेतकऱ्यांना नफादेखील चांगला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता योग्य मार्गदर्शन घेऊन शेती करावी, असे मिरची उत्पादक शेतकरी प्रवीण खैरकार यांनी सांगितले. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेती फायदेशीर होते, असा अनुभव आल्याचे खैरकार यांनी सांगितले.

आधुनिक पद्धतीने शेती केल्यास फायदेशीर
प्रवीण खैरकार यांच्याकडे ओलीताची एकूण चार एकर शेती आहे. त्यापैकी त्यांनी दोन एकर शेतीवर हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. यंदा कोरोना काळात सर्व उद्योग बंद असताना शेतीमधील सर्व कामे सुरू राहिली आहेत. यातच खैरकार यांनी मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. वेळेवर मिरची रोपांची लागवड, फवारणी व उत्तम नियोजना केल्याने मिरचीचे पीक चांगले आले आहे. दोन एकरात २० लाख रुपयांचे उत्पन्न होईल, असा विश्वास शेतकरी खैरकार यांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Oct 9, 2020, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details