अमरावती :विदर्भातील ऋणमोचन (Vidarbha Runmochan Yatra) या स्थळाचे महत्त्व शेकडो वर्षांपासून सांगितले जाते. गणेश पुराणात ऋणमोचन च्या परिसरात मुद्गल ऋषीचा आश्रम होता. (Devotees flock to Runmochan Yatra) मुद्दल ऋषीच्या नावानेच या ठिकाणी असणाऱ्या महादेवाच्या पिंडीला मुदगलेश्वर असे नाव पडले आहे. श्रीकृष्णाने अमरावतीच्या श्री अंबादेवी मंदिरातून रुक्मिणीचे हरण केल्यावर ते सर्वांत आधी ऋणमोचन येथील मुदगलेश्वराच्या दर्शनासाठी थांबल्याचा उल्लेख देखील पुराणात आहे. ऋणमोचन येथील मुदगलेश्वराला (Mudgaleshwar Temple Amravati) रविवारचे महत्त्व आहे. त्यातही पौष महिन्यात मुगलेश्वराच्या दर्शनाला अधिक महत्त्व असून पौष महिन्यात मुदग्लेक्षराला जल अर्पण करण्यास विशेष असे महत्व प्राप्त आहे. पौष महिन्यात भरणाऱ्या ऋणमोचनच्या यात्रेला मुद्गलेश्वराला जल वाहण्यासाठी हजारो भाविक येतात. (Latest news from Amravati)
गाडगे महाराज यात्रेत व्हायचे सहभागी :कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी संसाराचा त्याग केल्यावर आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात ऋणमोचन यात्रेतून केली होती. 1905 मध्ये संत गाडगेबाबांनी ऋणमोचन यात्रेत येणाऱ्या भाविकांना पूर्णा नदी पार करून मुद्दलेश्वराच्या दर्शनाला जाताना होणारा त्रास पाहता नदीच्या काठावर पहिल्यांदा घाट बांधला. नदीच्या पलीकडे मुद्गलेश्वराचे मंदिर असताना संत गाडगेबाबांनी नदीच्या अलीकडे लक्ष्मीनारायण मंदिर उभारले. या यात्रेत येणाऱ्या दीनदुबळ्या आणि अनाथांना पोटभर अन्न मिळावे यासाठी 1907 च्या यात्रेदरम्यान डेबुजी अर्थात संत गाडगेबाबांनी अन्नछत्र सुरू केले. हे अन्नछत्र आज देखील या यात्रेत अविरतपणे सुरू असून पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी सुमारे 7 हजार दिन दुबळ्यांना अन्नदान, वस्त्रदान या यात्रेत केले जाते. गाडगेबाबा आपल्या हयातीत प्रमोशन यात्रेत पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी नित्य नेमाने सहभागी व्हायचे.