महाराष्ट्र

maharashtra

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएसकडे

By

Published : Apr 3, 2021, 4:21 PM IST

Updated : Apr 3, 2021, 4:53 PM IST

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएस प्रज्ञा सरवदे करणार आहेत. वन विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

pradnya saravade
प्रज्ञा सरवदे

अमरावती -दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएस प्रज्ञा सरवदे करणार आहेत. याबाबतचे आदेश वन विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी काढले आहेत.

या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी महिला पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी भाजपा, वनरक्षक, वनपाल, रेंजर फॉरेस्ट असोसिएशनने केली होती. अखेर शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास दिला आहे. मेळघाटातील हरिसालच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च 2021 रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. उपवनसंचालक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तत्कालीन मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे दीपालीने विनोद शिवकुमार यांची वारंवार तक्रारी केली होती. तरीही न्याय न मिळाल्याने दीपालीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले.

काय आहे प्रकरण?
हरिसालच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, पती राजेश मोहिते आणि आई शांताबाई चव्हाण यांच्या नावे तीन स्वतंत्र पत्रे लिहिली होते. या तिन्ही पत्रात उपवनसंचालक विनोद शिवकुमार यांच्या जाचामुळे आत्महत्त्या करीत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पत्रात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून ते तक्रारीची दाखल घेत नव्हते. त्यांचा हात शिवकुमारच्या डोक्यावर आहे असेही दीपाली चव्हाण ने लिहिले आहे. असे असताना या प्रकरणात शिवकुमारला अटक झाली असताना रेड्डीची मात्र नागपूरला बदली करण्यात आली. दरम्यान विविध स्तरावर रेड्डी विरोधात आंदोलन पेटले. रेंजर्स असोसिएशनसह भाजप, युवा स्वाभिमान हे राजकीय पक्ष या आंदोलनात उतरले होते.

कोण आहेत प्रज्ञा सरवदे?

प्रज्ञा सरवदे या १९८९ बॅचच्या IPS आहेत. सुरुवातीला ६ वर्षे त्यांनी पश्चिम बंगाल येथे नोकरी केली. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी CBIमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा -शरद पवारांना मिळाला रूग्णालयातून डिस्चार्ज

हेही वाचा -चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी नागपुरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचा आकडा वाढला

Last Updated : Apr 3, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details